मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून सोमवारी पहाटे एका तरूणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. या युवकाचे नाव विक्रम शिरीष वासुदेव असून वरळीकडून वांद्रयाला येणाऱया मार्गावरून आपल्या वॅगनार कारमधून येत होता. दरम्यान, त्याने आपली कार सेतूच्या कडेला थांबवून समुद्रात उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून युवकाचा शोध सुरु आहे. अद्यापतरी त्याचा मृतदेह सापडेला नाही.