मुंबई शहरात लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणीकपात रविवार (३० मार्च २०१४) पर्यंत राहणार असून ३१ मार्चपासून पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. मोडक सागर तलावक्षेत्रात हाती घेण्यात आलेल्या कामामुळे पाण्याची पातळी खालच्या स्तरावर ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे २० ते ३० मार्चदरम्यान पाणीकपात लागू करण्यात आली होती.