मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
* राजकीय लाभासाठी काढला २१ नोव्हेंबरचा मुहूर्त
* विघ्न टाळण्यासाठी स्वीकारला गुप्ततेचा मार्ग
संसदेवर २००१ साली झालेल्या हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू याची फाशी अद्याप प्रलंबित असतानाच २००८च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला 'गुपचूप' फाशी देण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गुजरात निवडणूक आणि संसद अधिवेशनात विरोधकांना तोंड देण्यासाठी अजमल कसाबच्या फाशीसाठी २१ नोव्हेंबरचा मुहूर्त काढण्यात आला. तसेच पुन्हा दयेचा अर्ज, न्यायालयीन याचिका असे कोणतेही विघ्न त्यामध्ये येऊ नये, यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. कसाबलाही पुन्हा दयेचा अर्ज किंवा सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका करण्याचा पर्याय होता. पण तुरुंगाधिकाऱ्यांनी विचारूनही त्याने तशी इच्छा प्रदर्शित न केल्याने अखेर फाशी देण्यात आल्याचे समजते.
गुजरातमधील निवडणूक आणि संसद अधिवेशन तोंडावर असून विरोधकांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी कसाबला लवकर फाशी दिल्यास त्याचा राजकीय लाभ काँग्रेसला घेता येईल, असा विचार कसाबच्या फाशीमागे होता. अफझल गुरू आणि कसाबला फाशी देण्याची मागणी अनेकदा केली जाते. अफझल गुरूला फाशी दिल्यास त्याचे राजकीय पडसाद उमटतील. त्या तुलनेत कसाबला फासावर लटकावणे राजकीयदृष्टय़ा सोपे होते. त्यामुळे कसाबला फाशी देण्याचा निर्णय झाला. कसाबच्या फाशीचा मुहूर्त गुप्त ठेवण्यात आला होता. देशातील आणि परदेशातील मानवाधिकार संघटना, स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांपैकी कोणीही राष्ट्रपतींकडे पुन्हा दयेचा अर्ज केल्यास किंवा वेगळ्या मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यास संबंधित अर्ज अथवा याचिका निकाली निघेपर्यंत फाशी स्थगित ठेवावी लागते. कसाबचे पाकिस्तानात असलेले मातापिता किंवा नातेवाईक यांपैकी कोणीही राष्ट्रपती किंवा सर्वोच्च न्यायालयास साधे पत्र पाठवूनही काही मुद्दे मांडल्यास त्यावर सुनावणी घ्यावी लागली असती. कसाबलाही राष्ट्रपतींकडे पुन्हा अर्ज किंवा काही मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका करता आली असती. त्याने तशी इच्छा तुरुंगाधिकाऱ्यांकडे सांगितली असती, तर ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी फाशी स्थगित ठेवावी लागली असती. पण कसाबला याची कल्पना नसल्याने किंवा त्याची इच्छा नसल्याने त्याने कोणताही अर्ज करण्यास नकार दिला. दयेचे अर्ज किंवा याचिका कोणालाही वेगवेगळ्या मुद्दय़ांवर कितीही वेळा करण्याची मुभा कायद्यानुसार आहे. कालहरण करण्यासाठी हा मार्ग वापरला जातो. त्यामुळे असे कोणतेही विघ्न येऊ नये, यासाठी कसाबची फाशी गुप्त ठेवण्यात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी 'लोकसत्ता'शी बोलताना सांगितले.
अफझल गुरूसह सात जणांच्या याचिका गृहमंत्र्यांकडे
नवी दिल्ली : संसद हल्ल्यातील गुन्हेगार अफझल गुरू याच्यासह सात जणांच्या दयेच्या याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिप्रायासाठी गृहमंत्रालयाकडे पाठवल्या आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दयेच्या सर्व याचिका राष्ट्रपतींनी नव्याने कार्यभार घेतलेल्या गृहमंत्र्यांकडे पाठवण्याची प्रथा आहे, त्यानुसार राष्ट्रपतींनी दयेच्या सर्व प्रलंबित याचिका या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे पाठवल्या आहेत. शिंदे यांनी १ ऑगस्टला गृहमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संसद हल्ला प्रकरणातील आरोपी अफझल गुरू याच्यासह सात जणांच्या दयेच्या याचिका त्यांच्याकडे पाठवल्या आहेत.




















113) अजमल कसाबला आता फाशी देण्यात आलेली आहे त्याबद्दल काँग्रेस सरकार अभिनंदनास पात्र आहे. तथापि काही बाबींचा खुलासा सरकार कडून हवा आहे. अफझल गुरुच्या फाशीच्या शिक्षेपूर्वी अजमल कसाबला फाशी देण्याचे कारण काय? अजमल कसाबला फाशी अत्यंत गोपनीय रीतीने का देण्यात आली? बाळासाहेब ठाकरे हयात असताना अजमल कसाबला फासावर का चढवण्यात आले नाही? बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्वाणानंतर इतक्या तातडीने अजमल कसाबला फासावर का चढवण्यात आले? आता त्याला फासावर चढवण्यात आल्यानंतर सर्व मंत्री-संत्री काँग्रेसची आणि स्वतःचीच पाठ का थोपटून घेत आहेत? त्यांनी कसाबला फाशी देऊन देशावर किंवा जनतेवर किंवा त्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या दुर्दैवी जीवांवर उपकार केले आहेत असे त्याना का वाटत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे कॉंग्रेस देऊच शकणार नाही. पण त्याचे उत्तर आमच्याकडे आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्वी प्रतिभा पाटील याना राष्ट्रपती पदासाठी पाठींबा दिला होता त्याचे एक कारण त्या अजमल कसाब ला मुक्ती देतील अशी त्यांची अपेक्षा होती. याबाबतीत काहीही न करता पाच वर्षे स्वस्थपणे काढून त्यांनी निवृत्ती घेतली. प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या समजूतदार नेत्याला पाठींबा देण्यात सुद्धा त्यांच्याकडून स्व. शिवसेनाप्रमुखांची हीच अपेक्षा होती. केवळ अजमल कसाबाच नव्हे तर अफझल गुरूला सुद्धा फाशी झाली पाहिजे अशी सुद्धा अपेक्षा सर्वांचीच आहे. तरीही त्याच अफझल गुरूला अजूनही आपण पोसत आहोत. आता अजमल कसाबला एवढ्या तातडीने फाशी देण्याचे एकमेव कारण म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या अंत्ययात्रेला जमलेला महा प्रचंड आणि अतिशय शिस्तबद्ध समुदाय बघून काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली होती. एका नेत्यासाठी आत्तापर्यंत स्वातंत्र्योत्तर काळात एवढा प्रचंड समुदाय कोणीही बघितला नव्हता. कोणतेही घटनात्मक पद नसताना सुद्धा एखाद्या लोकप्रिय सम्राटाचा असावा तसा शिवसेनाप्रमुखांचा अंत्यविधी झाला ते बघून काँग्रेस नेत्यांची झोप उडाली होती. त्याला छेद देण्यासाठीच कॉंग्रेसी नेत्यांनी हा “सुमुहुर्त” शोधला. आता या फाशीचे पुरेपूर राजकारण सवंग प्रसिद्धीसाठी काँग्रेसी नेत्यांकडून केले जाईल आणि काँग्रेसची लोकप्रियता वाढवण्याचे दयनीय प्रयत्न केले जातील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अर्थात काहीही असले तरी अजमल कसाबला फाशी दिले हे उत्तम झाले. मी स्वतः गेल्या कित्येक वर्षांपासून या फाशीची मागणी करत आलो आहे. त्याला शेवटी पूर्णविराम मिळाला. तरीही शिवसेना प्रमुख हयात असताना काँग्रेस सरकारने कसाबला फाशी दिली असती तर मा. शिवसेनाप्रमुखाना अतीव समाधान झाले असते यात संशय नाही.