राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुजबळ यांच्या पाठीशी असून न्यायालयीन लढाईतून ते लवकरच बाहेर पडतील असा विश्वास व्यक्त करतांनाच राष्ट्रवादीला नामोहरण करण्याचा डाव सत्ताधारी पक्षांचा असून विद्यमान सरकारला थांबविण्यासाठी संपूर्ण ताकदीने लढा

देण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हा प्रभारी व माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केले आहे. जिल्हा राष्ट्रवादीची बैठक राष्ट्रवादी भवन येथे झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार हे होते. यावेळी व्यासपीठावर कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, पंकज भुजबळ, दिपीका चव्हाण, नरहरी झिरवाळ आदी उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते होते, आहेत व ज्येष्ठ नेतेच राहतील, असेही आ. पाटील यांनी नमूद केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकांना दिड वर्षांचाच कालावधी शिल्लक असल्याने आपण सर्वजण खांद्याला खांदा लावून निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे पाटील यांनी सांगितले. प्रास्ताविकात अ‍ॅड. पगार यांनी पक्ष कामकाजाचा आढावा मांडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.