राज्यात सर्वत्रच पाण्याचा तुटवडा असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून आठवडय़ातील दोन दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घोषित केला आहे. आठवडय़ाच्या दर बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत ४८ तास नवी मुंबईचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका क्षेत्रातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मुळे गावठाणे, झोपडपट्टी, दिघा विभाग, ऐरोली या परिसरात पाणीपुरवठा बंद राहील. या भागामध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिका व एमआयडीसीकडून करण्यात आले आहे.