आपल्याकडून शत्रूपक्षाला गोपनीय माहिती मिळू नये म्हणून सन्याच्या वा पोलिसांच्या ताब्यात सापडल्यावर अतिरेकी, गुंड सायनाइडच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करतात. खरेच का सायनाइड खाल्ल्यावर तात्काळ मृत्यू येतो?
सायनाइडची विषबाधा मुख्यत्वेकरून जे पदार्थ पाण्यात विरघळल्यावर सायनाइड आयन तयार करतात अशा पदार्थातून होते. सर्वसामान्यपणे सायनाइडची विषबाधा ही वायू स्वरूपातील हायड्रोजन सायनाइड आणि स्फटिक स्वरूपात असलेल्या पोटॅशिअम व सोडिअम सायनाइड यांच्यामुळे होऊ शकते. यातील हायड्रोजन सायनाइडमुळे तीव्र विषबाधा होऊन तात्काळ मृत्यू येऊ शकतो. लोकर, रेशीम आणि पॉलियुरेथेन किंवा व्हिनील इ. पदार्थ जाळल्यास यातून निघणाऱ्या धुरात या वायूचा समावेश असतो. हायड्रोजन सायनाइडचे औद्योगिक पातळीवर उत्पादन केले जाते आणि पॉलिमरपासून ते औषध कीटकनाशकांमध्ये वापरले जाते. त्यामुळे कीटकनाशकांमार्फतही ते आपल्यापर्यंत पोहोचू शकते. हायड्रोजन सायनाइड वायू हा रंगहीन असून याचा उत्कलनांक २५.६ अंश सेल्सिअस आहे. हा वायू पाण्यात विरघळतो आणि सायनाइड आयन तयार होतात, या स्वरूपात याला ‘हायड्रोसायनिक आम्ल’ म्हणतात. शरीरात गेल्यानंतर हायड्रोसायनिक आम्ल जठरात शोषले जाते व विषबाधेची लक्षणे दिसतात. पेशीतील मायटोकाँड्रियामध्ये असलेल्या ‘सायटोक्रोम सी ऑक्सिडेज’ या विकराच्या यंत्रणेवर या आम्लामुळे विपरीत परिणाम होतो व पेशी प्राणवायूचा उपयोग करू शकत नाही. म्हणजे रक्तात प्राणवायू पुरेशा प्रमाणात असला, तरीही पेशी प्राणवायूअभावी गुदमरतात व मरतात. साहजिकच व्यक्ती मृत्युमुखी पडते.
    पोटॅशिअम आणि सोडिअम सायनाइड हे पांढऱ्या रंगाच्या स्फटिक स्वरूपात असतात. हे दोन्ही पाण्यात विद्राव्य आहेत. या धातू सायनाइडची आम्ल आणि पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन हायड्रोसायनिक आम्ल तयार होते. सायनाइडची विषारी शक्ती त्यातून बाहेर येणाऱ्या हायड्रोसायनिक अ‍ॅसिडवर अवलंबून असते. ६० मि.ग्रॅ. शुद्ध हायड्रोसायनिक अ‍ॅसिड वा २०० मि.ग्रॅ. पोटॅशिअम सायनाइडमुळे मृत्यू होतो. हायड्रोसायनिक आम्लाचे सेवन केल्यास २ ते १० मिनिटांत, तर सोडिअम वा पोटॅशिअम सायनाइड खाल्ल्यास ३० मिनिटांत मृत्यू ओढवतो.    
 
प्रबोधन पर्व: श्रमाचा अभिमान वाटणारी पिढी महाराष्ट्रातील शिक्षणसंस्थांतून तयार होत नाही
‘‘महाराष्ट्र हा देशात औद्योगिकदृष्टय़ा ऐतिहासिक कारणामुळे व स्वातंत्र्योत्तर काळातही दिलेल्या प्रोत्साहनामुळे एक पुढारलेले राज्य समजले जाते. देशातील एकूण औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. परंतु आता विकासाच्या गतीच्या बाबतीत गुजरातने महाराष्ट्रास मागे टाकले आहे आणि इतरही अनेक राज्ये महाराष्ट्राबरोबर यशस्वी स्पर्धा करीत आहेत. पण खरा प्रश्न महाराष्ट्रातील औद्योगिक उत्पादनाची उत्पादनक्षमता, उत्पादनखर्च व दर्जा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करू शकेल असा आहे काय? महाराष्ट्रातील कापडधंद्याची तर संपूर्ण दुर्दसाच झाली आहे. उद्योगधंद्याच्या प्रगतीवरच अर्थव्यवस्थेचे सामथ्र्य अवलंबून असते. कृषी उद्योगासकट सर्व उद्योगधंद्यांचा गतीने व व्यापक विकास झाला तर लक्षावधी बेकारांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकू. म्हणून उद्योगधंद्याच्या प्रगतीकडे सर्व समाजाने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. व्यापार व उद्योगधंद्यात असलेल्या सामाजिक घटकासंबधित समाजातील गैरसमज दूर झाले पाहिजेत आणि व्यापार व उद्योगधंद्याच्या विकास ही राष्ट्रीय प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे सर्व समाजाने लक्षात घेतले पाहिजे.’’ अण्णासाहेब शिंदे ‘महाराष्ट्र : विकासाचे नवे प्रवाह’ यातील लेखात म्हणतात (१९९१) – ‘‘भारताला किंवा महाराष्ट्राला वेगाने प्रगती करावयाची असल्यास निरक्षरता नष्ट केल्याशिवाय व साक्षर, सुशिक्षित, कुशल, प्रजानन निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही.. एवढेच नव्हे तर शिस्तप्रिय, व्यवहारी ज्ञान असलेली, श्रमाविषयी प्रेम असलेली, श्रमाने हात व कपडे काळे करून घेण्यात अभिमान वाटणारी सुशिक्षित पिढी आपल्या शिक्षणसंस्थेतून आपण निर्माण करू शकलो नाही. राष्ट्र घडविणारी माणसे आणि समाज तयार केल्याशिवाय महाराष्ट्राचा किंवा भारताच्या प्रगतीचा पाया हा भक्कम आधारावर कधीच उभारता येणार नाही आणि म्हणून कितीही साधनसामग्रीची चर्चा केली तरी देश घडविणारा योग्य माणूस, योग्य शिक्षणपद्धती, शिस्तप्रिय समाज आणि व्यावहारिक ज्ञान असलेला समाज निर्माण केल्याशिवाय साधनसामग्रीचा हिशोब करून फारसेकाही निष्पन्न होणार नाही.’’

मनमोराचा पिसारा: डॉक्टर, रुग्ण आणि इतर सर्वासाठीचं वाचनीय पुस्तक
वैद्यक विषयातील माहिती देणाऱ्या पुस्तकांचे तीन-चार प्रमुख प्रकार असतात. (अर्थात पाठय़पुस्तकं वगळून) विविध रोगांची तपशिलात माहिती देणं, रोगांवरच्या उपचाराविषयी काही निवेदन करणं. काही पुस्तकं वैयक्तिक किंवा रुग्णांच्या (कुटुंबीय, समाज इ.) अनुभवावर बेतलेली तर काही वैद्यकीय पेशातील लोकांचा (डॉक्टर, औषध कं. इ.) भ्रष्टाचारावर झोड उठवणारी. पुस्तकातील मांडणीचा हा साचा ‘द हेल्दी माइण्ड, द हेल्दी बॉडी’ या पुस्तकाच्या लेखकानंही वापरलेला आहे (टीकेचा उद्देश नाही). या वस्तुपाठाच्या पलीकडे जाणाऱ्या काही पुस्तकांचा ‘पिसाऱ्या’मधल्या लेखात पूर्वी परिचय करून दिलेला आहे. (हाऊ डॉक्टर्स थिंक, कम्युनिकेशन फॉर डॉक्टर्स) परंतु, त्याही पलीकडे जाणारं अत्यंत उद्बोधक वाचनीय, प्रेक्षणीय असं हे पुस्तक हॅण्डबुक टाइम-लाइफ मेडिकल प्रसिद्ध केलेलं आहे.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर उत्तम आरोग्याकडे तुमच्या मनाचा कसा उपयोग कराल, असं म्हटलंय. (१) तणावमुक्ती (२) सुदृढ राहणं (३) आजारपणाचं व्यवस्थापन (४) रोगप्रतिकारशक्तीची वाढ (५) आनंदी मनोवृत्ती (मूड) टिकवणं आणि आरोग्यावरचा खर्च कमी करणं.
पुस्तकाचं स्वरूप हॅण्डबुक म्हणजे सहज वापरण्यास योग्य अशी माहिती वाचकापुढं दर्शनीय पद्धतीने मांडणं. साहजिकच पुस्तकात छोटी छोटी केसकथनं आहेत. लहान-मोठे तक्ते आहेत. काही चौकटीत मांडलेल्या प्रश्नावली आहेत. इतकंच काय पुस्तक वाचण्यापूर्वी छोटी चाचणी आहे आणि पुस्तक कसं वापरावं, याच्या सूचना आहेत.
थोडक्यात, विषयाचं गांभीर्य, महत्त्व आणि त्यातील वेदना लक्षात घेऊन पुस्तकानं वाचकाशी खेळीमेळीनं मैत्री केलेली आहे. पुस्तकाचा रोख आजार नसून आरोग्य कसं राखाल? व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे मनोविकारतेला कसा चेकमेट द्यायचा असा आहे.
विनोद आणि हास्यरस याला ‘लाफ्टर द बेस्ट मेडिसीन’ असं म्हटलं जातं. डॉक्टरांवर केलेले, आजारामुळे होणारी पंचाईत आणि गैरसमज यावर चुटके सांगितले जातात. क्षणभर हसू येतं, पण निरोगी विनोद कोणता? याविषयी भाष्य इथे केलं आहे. विशेषत: बारीकसारीक शारीरिक तक्रारी करणाऱ्या (हायपोकॉण्ड्रीअ‍ॅक) रुग्णांना जनरल डॉक्टर ‘चिअरअप’ (हसून विसरा) असा सल्ला देतात. अशा वेळी रुग्णाला हसू येत नाही, डॉक्टरला हसू येतं आणि त्यामुळे आपल्याला डॉक्टर समजून घेत नाही, माझ्या वेदनेची खिल्ली उडवली जाते आहे, असा रुग्णाचा (गैर?) समज होतो.
रुग्णग्रस्ततेतून सुटका करणं डॉक्टरला सहज-सोपं वाटतं. ते उत्तमच. कारण, त्यातून डॉक्टरचा आत्मविश्वास दिसून येतो. पण कधी रोगाचं गांभीर्य डॉक्टरला झेपत नाही आणि अपुरी माहिती देऊन तिथून डॉक्टर निसटतो किंवा रुग्णाला आजारातल्या धोक्याची नीट कल्पना देत नाही किंवा रुग्णाला घाबरवतो. या प्रत्यक्ष अडचणीच्या प्रसंगी रुग्ण आणि डॉक्टरनं परस्परांशी कसं नातं जोडावं यावर मुद्देसूद विवेचन आहे.
काही वेळा रुग्णाईत असण्याची रुग्णाच्या मनावर (अंतर्मनावर) इतकी सखोल प्रतिमा उमटते की त्यामुळे आपण आपल्यापरीनं विकाराचा सामना कसा करावा हे कळत नाही. रुग्ण मतिमूढ होतो. अशा वेळी रुग्ण आपली कल्पनाशक्ती वापरून स्वत:ची धडधाकट प्रतिमा मनावर कोरू शकतो.
आधुनिक ताणतणावानं मनावर विपरीत परिणाम होतो आणि शरीर चुकीच्या पद्धतीनं ताणाशी मिळतंजुळतं घेतं (मॅलअ‍ॅडाप्टेशन) अशा वेळी केवळ वैद्यकीय उपचार पुरत नाहीत. किंबहुना निष्कारणच रुग्णाचं मन शरीरात खिळवून ठेवलं जातं. त्या वेळी आपल्या मनाचा ठामपणा, वेळेचं सुनियोजन, आरोग्यसंपन्न सवयी वैद्यकीय उपचारांपेक्षा सरस ठरतात. हीच गोष्ट वारंवार चिडचिड, संतापाचा उद्रेक, तंबाखू, अमली पदार्थ, दारू यांची व्यसनं याभोवती जीवन घोटाळत राहतं.
यावर वैद्यकीय माहिती हवी, पण त्यावर मात कशी करायची याच्या युक्त्या इथे दिल्या आहेत. फक्त डॉक्टरांनीच नव्हे, तर सर्वानी सहज वाचावं, चाळावं आणि माहितीबरोबर सहभागी व्हावं, असं हे पुस्तक आहे.
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?