पुदिन्याच्या पानांचा उपयोग स्वयंपाकात करतात, पण पुदिन्याचा औषध म्हणून उपयोग अनेक कारणांसाठी केला जातो. पुदिन्यातला खरा हिरो आहे मेंथॉल.  
पुदिन्याच्या तेलातील मेंथॉल आणि मेंथाईल अ‍ॅसिटेट यांमुळे पुदिन्याला तीव्र वास येतो. मँगनीज, तांबे आणि जीवनसत्त्व ‘क’ यांचा पुदिना हा उत्तम स्रोत आहे. याशिवाय पुदिन्यात इतर बाष्पनशील तेलेही असतात. पुदिन्यामुळे कॅन्सरची, विशेषत: जठराच्या कॅन्सरची संभाव्यता कमी होते. मेंथॉल हे एक कार्बनी संयुग आहे. ते पाण्यात विरघळत नाही, पण अल्कोहोल आणि इथरमध्ये विरघळतं. पेपरिमट नावाची पुदिन्याची एक जात आहे, त्यात मेंथॉलचं प्रमाण ५० ते ६५टक्के असतं. तर जपानी पुदिन्यात त्याचं प्रमाण ७० ते ८५ टक्के असतं.  मेंथॉलचे स्फटिक पांढरे, तीव्र वासाचे, जिभेला थंडावा देणारे, स्वादिष्ट असतात.
आपण पेपरिमटच्या गोळ्या खातो ना, त्यात मेंथॉलच असतं. मेंथॉलमुळेच पेपरिमटच्या गोळ्या गारेगार आणि चवीला छान लागतात. च्युईंगम, टूथपेस्ट, औषधे, गुळण्या करण्यासाठी असणारी द्रावणे, इत्यादींमध्ये स्वादासाठी मेंथॉलचा उपयोग केला जातो. मेंथॉलमुळे त्वचेतील थंड तापमानाची जाणीव करून देणाऱ्या चेतापेशी उद्दीपित होतात आणि मेंदूकडे संवेदना पाठवतात. म्हणूनच पुदिना तेलाचा स्पर्श त्वचेला होताच तेथे थंडावा जाणवतो.
पुदिन्यातील मेंथॉल वापरून काही औषधे तयार केली जातात. फार पूर्वीपासून पोटदुखीवर औषध म्हणून पुदिना वापरला जात आहे. पुदिन्यामुळे पोटाचे मृदू स्नायू शिथिल होतात; त्यामुळे पोटात मुरडा येत नाही. मेंथॉलमुळे पोटाला आराम तर मिळतोच, पण सूक्ष्म जिवांचीही वाढ होत नाही. याशिवाय डोकं दुखलं, की पेपरिमट तेल (पुदिन्याचं तेल) कपाळावर चोळतात. सर्दी झाली की श्वास घ्यायला त्रास होतो, त्या वेळी श्वसन करणं सुलभ व्हावं म्हणून पेपरिमट तेल नाकावर, गळ्यावर चोळतात. मेंथॉलमुळे घट्ट शेंबूड द्रवरूप होतो व बाजूला सारला जातो. चोंदलेलं नाक मोकळं होतं.
तोंडाची दरुगधी घालवण्यासाठी, टूथपेस्टमध्ये, माऊथवॉशमध्ये पेपरिमट तेल घातलेले असते. पुदिन्याचं तेल हे नसíगक कीडनाशक म्हणूनही वापरलं जातं. त्यातील प्युलगॉन (pulegone) व मेंथाल हे घटक विशेष प्रभावी आहेत.
 
मनमोराचा पिसारा: डिलबर्ट उवाच
जीवनाला यशस्वी वळण लावणारे काही नियम सरळ असतात, त्यामुळे त्यांना वळविणं कठीण होतं. काही निरीक्षणांमधून सत्याचं दर्शन होतं, पण ते डोळस नसल्याने तो आभास ठरतो. अशी काही अनुमाने, कन्फेशन आणि सुवचनांचा इथे लेखाजोखा मांडतोय. यातील मर्मदृष्टी अर्थातच अलिखित आहे..
१) मी मदिरेला नेहमी ‘नको, नको’ म्हणतो, पण ती बहिरी असल्यानं, तिला ऐकू येत नाही.
२) घटस्फोट होण्यामागे हे एकमेव कारण विवाह आहे.
३) आपण गाडी चालवीत असताना व समोरून विरुद्ध बाजूने गाडय़ा येत असल्यास आपण ‘राँग लेन’मध्ये गाडी चालवीत असण्याची बरीच शक्यता असते.
४) गडद काळोखी बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला दिसणारा उजेड समोरून वेगानं येणाऱ्या गाडीच्या दिव्याचाही असू शकतो.
५) आपण छत्री घेतल्यामुळे पाऊस थांबलाय, असं वाटून अनेक जण (छत्रीबाहेर) हात काढून निराश होतात.
६) जीवन क्षणभंगुर असतं, त्यामुळे जेवताना आपली आवडती डिश आधी खाऊन टाका.
७) आपल्या पायावर ठाम उभं राहिल्यामुळे पायात पँट कशी चढवावी हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.
८) वक्तशीर असण्यातील अडचण अशी की, ऑफिसात वेळेवर पोहोचल्यावर आपलं कौतुक करायला कोणी हजर नसतं.
९) ‘उद्या’ नावाचा दिवस कॅलेंडरवर कधी दिसत नाही.
१०) चुकणं हा माणसाचा स्वभाव असतो, माफ करणे देवाची सवय असते; परंतु तशी कोणत्याही कंपनीची ‘पॉलिसी’ नसते.
११) मला यशाची किल्ली सापडते तेव्हा नशिबानं कुलूप बदललेलं असतं.
१२) आपल्याला कर्जाची अजिबात गरज नाही, हे बँकेला पटलं तरच कर्ज मिळते.
१३) यशाचा रस्ता नेहमीच ‘अंडर कन्स्ट्रक्शन’ असतो.
१४) स्वतंत्र देशात बोलणं ‘फ्री’ असतं, ध्वनिलहरी फोनद्वारे इकडून तिकडे हवेमधून पाठवायला पैसे मोजावे लागतात.
१५) चेहऱ्यावर कायम स्मितहास्य ठेवा, तुम्ही काय विचार करताय, याचं कोडं लोक सोडवत बसतील.
काही कानपिचक्या डिलबर्टच्या, तर काही अस्मादिकांच्या..
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: व्यवहार, धर्म आणि अहंकार
‘‘व्यवहार आणि धर्म यात पूर्वी फारकत असे. शेजाऱ्याला शत्रू मानणे हा व्यवहार आणि शत्रू ठार मारायला आला तरी त्याच्या पोटात तुमचाच आत्मा आहे असे समजणे हा त्यावेळी धर्म होता. व्यवहाराची मूल्ये निराळी, धर्माची मूल्ये निराळी; जे धर्मात आहे ते व्यवहारात आणता येत नाही, जे व्यवहार्य आहे ते धर्मसंमत होऊ शकत नाही; धर्म तरी आचरा किंवा व्यवहार तरी करा असे सांगण्यात येई. पूर्वी आपण आणि आपला शेजारी दोघेही भटके होतो. वास्तव्यासाठी जमीन मिळविण्याची, उदरभरणार्थ अन्न मिळविण्याची आपल्याला जरूर होती. त्याकाळी माणसाला लागेल तेवढे अन्नच निर्माण करण्याची पात्रता आपल्यात नव्हती. ख्रिस्त, बुद्ध, पैगंबर, याज्ञवल्क्य यांचे आध्यात्मिक ज्ञान वाढलेले असले, तरी त्यांचे भौतिक ज्ञान सामान्य रानवट शेतकऱ्यांइतकेच होते आणि म्हणून अपुरा साठा पुरविण्यासाटी मानवांना परस्परांचा संहार करावा लागे. आज ती परिस्थिती राहिली नाही. म्हणून आता धर्म हाच व्यवहार आणि व्यवहार हाच धर्म हे नवे मूल्य झाले पाहिजे.’’ अशी नवी मूल्यमांडणी करत आचार्य स. ज. भागवत व्यक्तिगत अहंकाराची मीमांसा करताना म्हणतात – ‘‘आजची युद्धे अन्नासाठी होत नाहीत, अहंकारासाठी होत असतात. सर्व जगाला पुरेल एवढे अन्न आज आपण सर्व मानव निर्मू शकतो; पण माणसांना अन्न देऊन जगविण्यापेक्षा लढाई करून मारण्यात आज अनेकांना पुरुषार्थ वाटत असतो. लढाया करणारे लोक निरनिराळी कारणे पुढे करीत असतात. कोणी लोकशाहीसाठी लढण्याचा आव आणतो, कोणी राष्ट्राच्या हितासाठी रणशिंग फुंकारल्याचे सांगतो, कोणी संस्कृतीच्या रक्षणाची थाप ठोकतो. काही महत्त्वाकांक्षी, अभिमानी, अहंकारी लोक माझा जय व्हावा म्हणून, माझ्या धर्माचा जय व्हावा म्हणून, माझ्या राष्ट्राचे कल्याण व्हावे, म्हणून लढा पुकारतो. पण वस्तुत: ते इतरांवर प्रभुत्व गाजविण्याच्या अहंकारासाठी हे सारे करीत असतात. अहंकाराला उंची असते पण रुंदी नसते. शेवटी या अहंकाराचा विजय होतो काय? अहंकाराचे नेहमी पतन होत असते.’’

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Gold Silver Price on 1 March
Gold-Silver Price on 1 March 2024: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
Gold Silver Price
Gold-Silver Price on 28 February 2024: सोन्याच्या दरात आज कोणताही बदल नाही, पाहा काय आहे १० ग्रॅम सोन्याचा भाव