पुण्यातील आळंदी येथे शुक्रवारी एका प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे आळंदी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार समोर आला. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पाटील (वय ३५ रा. डागुर्ण ता.सिंदखेडा जिल्हा धुळे) आणि रीना गिरीगोसावी (वय वर्ष २५ रा. धुळे) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही धुळ्यात राहणार होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून दोघेही घरातून बेपत्ता होते. आज दुपारी त्यांचे मृतदेह इंद्रायणी नदीच्याकाठी आढळून आले. यावेळी त्यांच्या मृतदेहाशेजारी विषारी औषधाची बाटली आढळून आली. दरम्यान, मृत रीना हिचे लग्न झाले होते. मात्र, गेल्या काही काळापासून तिचे राहुलशी प्रेमसंबंध होते. आत्महत्येपूर्वी रीनाने आपल्या घरच्यांना फोन केला होता. त्यावेळी आपण आत्महत्या करत असल्याचे तिने सांगितले होते, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली.

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू