दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. अथर्व संतोष पाटील वय वर्ष १६ असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. निगडी येथील त्रिवेणीनगर येथे अथर्व आणि त्यांचा परिवार राहत होता. काल रात्री ८:३० च्या सुमारास अथर्व हा दार उघड नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी दरवाजा ठोठावला मात्र बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर देखील अथर्वने दरवाजा न उघडल्याने अखेर त्याच्या घरच्यांनी दरवाजा तोडला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे.  तसेच अथर्व हा दहावीच्या वर्गात शिकत असून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या परीक्षांचे त्याच्यावर दडपण होते आणि त्याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती त्याने चिठ्ठीत लिहन ठेवली आहे. त्यातूनच हि आत्महत्या झाली आहे अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे.  पाटील कुटुंबीय हे मूळचे जळगावचे आहेत.