महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली.
संधी असूनही बाळासाहेबांनी एकदाही निवडणूक लढवली नाही. घणाघाती भाषणे व विरोधकच काय पण मित्रपक्षाच्याही टोप्या उडवणारी अनोखी भाषणशैली, वेळोवेळी घेतलेल्या भूमिका यामुळे आजही बाळासाहेब ठाकरे यांचा राज्यातील राजकारणावर प्रभाव कायम राहीला आहे.