भारतासह जगभरामध्ये व्हॉट्सअप (Whatsapp) या सोशल मीडिया अॅपचा (Social Media App) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या देशामध्ये याचा वापर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करत आहेत. जानेवारी २००९ मध्ये ब्रायन अॅक्टन आणि जॅन कोम यांनी व्हॉट्सअप कंपनीची स्थापना केली होती. लगेचच फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॉट्सअप भारतामध्ये लॉंच करण्यात आले. संदेशवहनासाठी उपयुक्त असणाऱ्या या अॅपमध्ये अनेक फीचर्स पाहायला मिळतात. वापरण्यासाठी सोप्पे असल्याने याच्या वापरकर्तांमध्ये वाढ होत गेली. <br />
२०१४ मध्ये मार्क झुकरबर्गने ही कंपनी विकत घेतली. सध्या व्हॉट्सअप सर्वांसाठी सर्वात आवश्यक असे अॅपलिकेशन बनले आहे. ऑफिसच्या कामापासून ते चॅटिंग करण्यापर्यंत बऱ्याच गोष्टींसाठी याचा वापर केला जातो. करोना काळामध्ये सरकारला व्हॉट्सअपचा खूप फायदा झाला होता. Read More
WhatsApp Search Messages by Date : फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सॲप वापरणाऱ्या अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी विशिष्ट तारखेचे चॅट शोधण्यासाठी एक…