मीरा रोडमधल्या इंद्रलोक परिसरातील झोपडय़ांना आग, सिलेंडरचा स्फोट

मीरा रोड येथे इमारत बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या झोपडय़ांना आग लागून त्यात एका ३६ वर्षीय अपंग महिलेचा मृत्यू झाला. या वेळी लागलेल्या आगीत झोपडय़ांमध्ये असणाऱ्या चार गॅस सिलेंडरचेदेखील स्फोट झाले. झोपडय़ांच्या आसपास आणखी चार लहान मुले खेळत होती मात्र आग लागल्याचे दिसताच ही मुले तेथून पळण्यात यशस्वी ठरल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
Top 5 Things To Check In Charger C Type Or Universal
मोबाईल चार्ज करताना झालेल्या चुकीने ४ भावंडांचा अंत! चार्जर खरेदी ते चार्जिंगची जागा, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
Cheistha Kochhar Accident
लंडनमध्ये PHD करणाऱ्या भारतीय विद्यार्थिनी चेइस्ता कोचर यांना ट्रकने चिरडलं, अपघातात मृत्यू

मीरा रोड येथील इंद्रलोक परिसरातल्या बाळासाहेब ठाकरे मैदानाशेजारी असलेल्या रिकाम्या जागेत विकासकाने मजुरांसाठी झोपडय़ा बांधल्या होत्या. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या झोपडय़ांना अचानक आग लागली. झोपडय़ांमधून राहणारे मजूर कामावर निघून गेल्याने या वेळी झोपडय़ांमध्ये ३६ वर्षीय अपंग कृष्णा दास आणि तीन-चार मुलेच होती. आग लागताच मुले झोपडय़ांबाहेर पडण्यात यशस्वी ठरली. दुर्दैवाने अपंग कृष्णा मात्र झोपडी बाहेर पडू शकल्या नाहीत आणि आगीत त्यांचा करुण अंत झाला. या वेळी आसपासच्या नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु बांबू आणि प्लास्टिकच्या साहाय्याने बांधलेल्या झोपडय़ा जळून खाक झाल्या. या वेळी झोपडय़ांमध्ये असलेल्या चार गॅस सिलेंडरचे स्फोटही झाले. आगीची तीव्रता एवढी होती की आगीच्या धगीमुळे लगतच्या इमारतीचे सांडपाण्याचे पाइपदेखील वेडेवाकडे झाले.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली. आग लागली त्याला लगतच वीज कंपनीचे उपकेंद्र आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले नसते तर उपकेंद्रातील ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट होऊन अधिक नुकसान होण्याची शक्यता होती.

पित्याशी शेवटचा संपर्क होऊ शकला नाही

घटनेत मृत्यू झालेला कृष्णा दास याला अपंग असल्याने स्वत:हून चालणे शक्य नव्हते. आग लागल्याचे दिसताच जिवाच्या आकांताने त्याने ओरडायला सुरुवात केली परंतु त्याचा उपयोग होत नसल्याचे पाहून स्वत:च्या मोबाईलवरून त्यांनी आपल्या पित्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु अखेपर्यंत तो झालाच नाही. आगीत मृत्युमुखी पडलेल्या कृष्णा यांची आपल्या पित्याशी अखेरची बातचीतदेखील होऊ न शकल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत होती.