दारुच्या नशेत गाडी चालवणे दोघांच्या जीवावर बेतले आहे. नशेत गाडी चालवताना नियंत्रण सुटल्याने गाडीला अपघात झाला. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर हा अपघात झाला आहे. दारुच्या नशेत बेफाम गाडी चालवताना चालकाचा ताबा सुटला. यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. आनंद नगर नाक्यावर पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात मृत्यू झालेले दोघेही २५ वयोगटातील आहेत. अपघातग्रस्त गाडीत बीयरच्या बाटल्या आढळल्या आहेत. पोलिसांनी राहुल पवार या चालकाविरोधात दारुच्या नशेत वाहन चालवणे आणि दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर वेदांत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.