मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्य़ातील चारोटीजवळील मेढवण खिंडीत गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या कारचा शनिवारी दुपारी भीषण अपघात होऊन तीन जण ठार झाले.
रमेश चौधरी (३५), खुशी चौधरी (२७), मोनाली चौधरी (१३) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात त्यांचा सात वर्षांचा मुलगा आणि चालक मुकेश मेघवाड (२०) गंभीर जखमी झाले आहेत. चौधरी कुटुंबीय मूळचे पुण्याचे आहे. राजस्थानहून लग्न समारंभ आटोपून ते परतत होते. धोकादायक वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.