भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स करत दहशतवाद्यांना ठार केले. उरी हल्ल्याला चोख उत्तर देत भारताने या दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त केली. भारतीय लष्कराच्या या कामगीराचा आनंद देशभरात साजरा होत आहे. हिच वेळ साधून दिल्लीच्या एका हॉटेलने बर्गर आणि इतर खाद्यपदार्थांवर २० टक्क्यांची सवलत दिली आहे. भारताने यशस्वी सर्जिकल स्टाईक्स करून पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या आनंदात आम्ही खाद्यपदार्थांवर २० टक्के सवलत देत असल्याचे दिल्लीच्या बर्गर सिंग हॉटलेने आपल्या ग्राहकांना सांगितले. तशा प्रकारचा मेसेज त्यांनी ग्राहकांना केला.
परंतु अशा प्रकारे सवलत देऊन ग्राहक खुश होण्याऐवजी कमालीचे नाराज झाले. हे हॉटेल असंवेदनशील असून केवळ प्रसिद्धीसाठी असे फंडे वापरत असल्याची टीका अनेकांनी केली.  हॉटेल जाहिरात करण्यासाठी असे फंडे वापरत असल्याच टीका होत आहे. पण दहशतवाद्यांवर मिळवलेला विजय साजरा करणे हे असंवेदशनशीलपणाचे लक्षण नसल्याचा खुलासा हॉटेलने नाराज झालेल्या ग्राहकांनापुढे केला. भारताने पाकविरुद्ध कठोर भूमिका घेत त्यांना चांगला धडा शिकवला त्यामुळे या आनंदात आम्ही सवलत दिल्याचे त्यांनी सांगितले. नंतर या हॉटेलने ही सवलत ३० टक्क्यांपर्यंत वाढवली.