अर्थशास्त्र : अर्थशास्त्र (ECONOMICS)  हा शब्द ग्रीक शब्द OIKONOMIA या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. ज्याचा अर्थ Management of Household administration म्हणजे घरगुती व्यवस्थापन करणे असा होतो. अ‍ॅडम स्मिथच्या मते संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय.
अर्थव्यवस्थांचे प्रकार –
जागतिक अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण दोन निकषांवर करतात.
१) उत्पादक साधनसंपत्तीच्या मालकीनुसार २) विकासाच्या अवस्थेनुसार.
१) उत्पादक साधनसंपत्तीच्या मालकीनुसार याचे पुन्हा तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते. अ)भांडवलशाही अर्थव्यवस्था ब) समाजवादी अर्थव्यवस्था क)मिश्र अर्थव्यवस्था
अ) भांडवलशाही अर्थव्यवस्था (Capitalistic Economy) –
 ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनांची साधने खासगी मालकीची असतात.
वैशिष्टय़े – १) उत्पादक उपभोगाच्या मागणीनुसार वस्तूचा पुरवठा करतात.
२) ग्राहक सार्वभौम असतात, त्यांच्या पसंतीनुसारच उत्पादन केले जाते. थोडक्यात, उपभोक्ता बाजारपेठेत राजा असतो. ३) किंमत ठरविण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते म्हणजे ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्तअसते. म्हणून या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असेदेखील म्हणतात. (Laisser faire).
४) उत्पादन हे नफा मिळविण्याच्या हेतूने केले जाते.
दोष-आíथक सत्तेचे केंद्रीकरण झाल्याने गरिबी व श्रीमंतांची दरी वाढत असते. त्याप्रमाणे गरिबी, बेरोजगारी, पर्यावरण आदींचा विचार केला जात नाही.
ब) समाजवादी अर्थव्यवस्था (Socialist Economy) – ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारच्या म्हणजे सार्वजनिक मालकीची असतात, त्यांना समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात.
वैशिष्टय़े- १) उत्पादनांची साधने सरकारी मालकीची असतात. २) वस्तू आणि सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. सर्व आíथक निर्णय सरकार घेते. ३) या व्यवस्थेत ग्राहक सार्वभौम ठरत नाही.
दोष- यात व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप होतो. कधीकधी सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होतो. कार्यक्षमता, उत्पादकता कमी होते.
क) मिश्र अर्थव्यवस्था (Mixed Economy)- ज्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खासगी अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी अस्तित्वात असतात, त्या अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात.
वैशिष्टय़े-१) खासगी मालमत्तेचा मर्यादित हक्क असतो. २) काही उद्योगांची उभारणी सरकारी व खासगी स्तरावर केली जाते. ३) भांडवली आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा दोष टाकून चांगल्या गुणांचा समन्वय या अर्थव्यवस्थेत करण्यात आला आहे.
विकसित अर्थव्यवस्था- ज्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण मोठे असते. मोठय़ा प्रमाणावर औद्योगीकरण, शहरीकरण झालेले असते. त्याचप्रमाणे साक्षरतेचे प्रमाण जास्त असते. जन्मदर व मृत्युदराचे प्रमाण कमी असते. उदा. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इ.
विकसनशील अर्थव्यवस्था- ज्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण तुलनेने कमी असते. साक्षरतेचे प्रमाण कमी असते. मात्र जी अर्थव्यवस्था आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था असे म्हणतात.
उदा., भारत, श्रीलंका, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील काही देश.
आधारभूत वर्ष (Base Year)- वस्तू आणि सेवांच्या किमती अस्थिर असल्यामुळे खरे राष्ट्रीय उत्पन्न वाढते आहे किंवा किमती वाढल्या आहेत हे कळत नाही, म्हणून उत्पन्नाची मोजणी एखाद्या स्थिर वर्षांची तुलना करून केली जाते. या स्थिर वर्षांला आधारभूत वष्रे असे म्हणतात. २०१०मध्ये अभिजीत सेनगुप्ता समितीच्या शिफारशीवरून २००४-२००५ हे नवीन आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आले. उदा. २०१२ मध्ये मोजल्या जाणाऱ्या सर्व वस्तू व सेवांच्या किमती २००४-२००५ मधील किमतीशी तुलना करून मगच मोजल्या जातील.
हरित जी.डी.पी. (Green GDP) – बऱ्याच वेळा आíथक विकास होताना नसíगक स्र्रोतांचा ऱ्हास होत असतो. या सर्व घटकांचा विचार करण्यासाठी हरित जी.डी.पी. ही संकल्पना १९९५मध्ये उदयास आली. हरित जी.डी.पी.ला Health of Nations असेही म्हणतात. प्रमुख संख्याशास्त्रज्ञ प्रणब सेन यांच्या अध्यक्षतेखाली २०१५ पासून हरित जी.डी.पी.चे आकडे प्रकाशित करण्याचा प्रयत्न चालू आहे.
केंद्रीय सांख्यिकी संघटन (CSO) – भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी Central Statistical Organisation कडे आहे. या संस्थेच्या स्थापनेची घोषणा १९५४मध्ये करण्यात आली. उरड चे मुख्यालय दिल्ली येथे आहे. ठरडला मदत करण्यासाठी National sample survey organization
( NSSO) ची स्थापना करण्यात आली.
मायक्रोइकॉनॉमिक्स (Micro Economics) – यात बाजारपेठेतील विक्रेता आणि ग्राहक या मूलभूत घटकाचा अभ्यास केला असतो.
उदा. पुस्तकबांधणी, आगकाडय़ा तयार करणे तसेच खरेदीदार, विक्रेता या घटकांचा विचार केला असतो.
मॅक्रोइकॉनॉमिक्स (Macro Economics ) – यात अर्थव्यवस्थेच्या व्यापक घटकांचा विचार केलेला असतो. म्हणजे यात राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, बेरोजगारी चलनविषयक धोरण, राजकोषीय धोरण यांचा अभ्यास केलेला असतो.

यूपीएससीची मुख्य परीक्षा
पूर्व परीक्षा देऊन आल्यानंतर विद्यार्थ्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे पूर्व परीक्षेचा निकाल येईपर्यंत वाट पाहत राहणे. जर पास झालोच तर मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करणे. असे केल्यास पूर्व परीक्षा झाल्यानंतरचे जे महत्त्वाचे दिवस असतात ते वाट पाहण्यात निघून जातात व निकालात जरी आपण पास झालो तरी उरलेल्या काळात मुख्य परीक्षेचा अभ्यास होत नाही व आता बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तर एवढय़ा कमी काळात मुख्य परीक्षेचा अभ्यास पूर्ण होणे कठीण आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्व परीक्षेत पास होऊ की नाही, आपणास पूर्व परीक्षेत किती मार्क्‍स मिळतील, इतर विद्यार्थ्यांना पेपर कसा गेला आहे इ. माहिती मिळविण्यापेक्षा सरळ मुख्य परीक्षेच्या तयारीला सुरुवात करावी. संघ लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर (www.upsc.gov.in) जर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला तर त्यात एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे पेपर २ ते ५ यांचे स्वरूप असे असेल की एखादा सुशिक्षित माणूस कोणत्याही विशेष ज्ञानाशिवाय (without any specialized study) We परीक्षा देऊ शकेल. यातील प्रश्न हे विद्यार्थ्यांचा प्रशासकीय सेवांशी संबंधित विषयाचे सामान्य आकलन तपासतील. यामध्ये विद्यार्थ्यांचे सर्व सुसंगत विषयांचे मूलभूत ज्ञान तसेच परस्परविरोधी सामाजिक व आíथक उद्दिष्ट मागण्या यांचे विश्लेषण करून मत बनविण्याची क्षमता याची चाचणी होईल.
२०१३च्या मुख्य परीक्षेपासून ऐच्छिक विषय एकच आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार दोन ऐच्छिक विषय निवडावे लागत याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी.
पेपर ६ व ७ जो ऐच्छिक विषयाशी संबंधित आहे. त्याचा आवाका ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाएवढा असेल जो पदवीपेक्षा जास्त पण पदव्युत्तर अभ्यासक्रमापेक्षा कमी असेल. मात्र अभियांत्रिकी कायदा, वैद्यकीयशास्त्रांचा अभ्यासक्रम पदवी दर्जाचाच असेल. विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेत कसे उत्तर लिहावे यासंबंधी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ओळ या अभ्यासक्रमात नमूद केली आहे. ती म्हणजे विद्यार्थ्यांनी सुसंगत, अर्थपूर्ण आणि संक्षिप्त उत्तर लिहावे. (The candidates must give relevant, meaningful and succinct answers). नवीन अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
अ) ८ व्या परिशिष्टामधील कोणतीही एक भारतीय भाषा – ३०० गुण. ब) इंग्रजी – ३०० गुण.
वरील दोन्ही पेपर्समधील गुण एकूण गुणात ग्राहय़ धरले जात नाहीत. मात्र वरील दोन्ही पेपर पास होणे आवश्यक असते, जर विद्यार्थी वरील पेपरमध्ये नापास झाला तर त्याचे पुढचे पेपर तपासले जात नाहीत. एकूण गुणात ग्राहय़ धरले जाणारे पेपर पुढीलप्रमाणे-
पेपर १ निबंध- (गुण २५०)- विद्यार्थ्यांना एका विशिष्ट विषयावर निबंध लिहावा लागतो. निबंधाच्या विषयाचे पर्याय उपलब्ध असतात. निबंध विषयाशी सुसंगत, स्पष्टपणे लिहिणे अपेक्षित आहे. अभ्यासक्रमात असे नमूद करण्यात आले आहे की थेट व परिणामकारक अभिव्यक्तीस गुण दिले जातील. निबंधाचा हा पेपर मराठी भाषेतून देखील  लिहिता येईल.
पेपर २ सामान्य अध्ययन- १ (गुण २५०)- भारतीय संस्कृती व वारसा, जग व समाजाचा इतिहास आणि भूगोल.
पेपर ३ सामान्य अध्ययन- २ (गुण २५०)- शासनयंत्रणा संविधान, प्रशासन, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध.
पेपर ४ सामान्य अध्ययन- ३ (गुण २५०)- तंत्रज्ञान, आíथक विकास, जैवविविधता पर्यावरण सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन.
पेपर ५ सामान्य अध्ययन- ४ (गुण २५०)- नीतिमूल्य, एकात्मता व प्रवृत्ती
पेपर ६ व ७ वैकल्पिक विषयासंदर्भात- विद्यार्थी हा अधिसूचनेत नमूद केलेल्या विषयांपकी कोणताही एक विषय म्हणून घेऊ शकतो. त्याचे दोन पेपर असतील व प्रत्येकी २५०, २५० गुणांचे असतील म्हणजे वैकल्पिक विषय आता इंग्रजी किंवा मराठीत लिहिता येईल. संघ लोकसेवा आयोगाने आपल्या अधिसूचनेत नमूद केलेला अभ्यासक्रम पाहिल्यास असे लक्षात येते की नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ऐच्छिक विषयाचे महत्त्व थोडे कमी केले आहे.
मुख्य परीक्षेची तयारी कशी कराल?
पूर्व परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते तर मुख्य परीक्षा ही दीर्घ उत्तरे या स्वरूपाची असते, नवीन अभ्यासक्रम जर बारकाईने अभ्यासला तर सामान्य अध्ययनाचा पेपर चालू घडामोडीशी संबंधित आहे, म्हणजे आपल्या अवतीभोवती काय घडत आहे त्याचा आपल्या देशाच्या राजकारण, समाजकारण व अर्थकारणावर कसा प्रभाव पडत आहे, याचा बारकाईने अभ्यास करावा, त्यासाठी रोजच्या रोज कमीतकमी दोन दैनिकांचे वाचन करावे त्यांची टिपणे काढून ठेवावीत. याचा सर्वात जास्त फायदा मुख्य परीक्षेसाठी होतो. टीव्हीवर दिवसातून एकतरी कार्यक्रम देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडले, यासंबंधी चर्चासत्रांचा असतो, या ठिकाणी देशातील विभिन्न भागांतून त्या विषयाशी संबंधित तज्ज्ञामार्फत चर्चा होत असते, असे कार्यक्रम अवश्य पाहावेत.  त्यावर परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो याचा विचार करून असा प्रश्न आल्यास आपण कसे उत्तर लिहू शकतो हे प्रत्यक्ष लिहून पाहावे असे केल्यास सामान्य अध्ययनात प्रश्न कसाही विचारला गेल्यास त्याचे मुद्देसूद उत्तर लिहिण्यास आपण यशस्वी ठरतो. बऱ्याच विद्यार्थ्यांची एक चूक होते ती म्हणजे मुख्य परीक्षेस त्यांचा अभ्यास  चांगला असतो, परंतु प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत याचा सराव न केल्याने त्यांना मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळत नाहीत. गेल्या ४ ते ५ वर्षांच्या मुख्य परीक्षेच्या पेपरचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की आयोग आजकाल प्रश्न सरळ सरळ विचारत नाही.

Ravi Shastri Posted a Unique photo on Twitter went viral
रवी शास्त्रींच्या फोटोने सोशल मीडियावर चर्चेला उधाण, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस
How Artificial Intelligence Helps to Talk with Animal in Marathi
AI Animal Talk : AI सांगणार प्राण्यांच्या मनात काय चाललंय?, त्यामुळे डॉक्टरांना कशी होईल मदत? जाणून घ्या…
can Sugarcane juice cure diabetes
Sugarcane Benefits : ऊसाच्या रसामुळे मधुमेहाचा आजार दूर होतो का? तज्ज्ञांनी दूर केले गैरसमज; वाचा, ऊसाचे अनेक फायदे
follow these steps to delete your account and Remove number from the Truecaller app On Android And iOS
Truecaller वरून तुमचे अकाउंट अन् नंबर कसं Deactivate कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस