राजकीय विरोधकांना संपवण्याच्या सध्याच्या जमान्यात राजकीय नेत्यांवर केली जाणारी टीकाही अजिबात सहन केली जात नाही. पण सार्वजनिक जीवनात काम करताना टीका तर होणारच आणि ती सहनही केली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता सुनावले. त्याचबरोबर लोकशाही व्यवस्थेचा आवाज दाबून टाकण्यासाठी अब्रूनुकसानीच्या खटल्याचा वापर करू नका, या शब्दांत न्यायालयाने जयललिता यांना फटकारले.