सर्वोच्च न्यायालयाने बुधावारी दहीहंडीवर घातलेल्या निर्बंधाविरोधात दाखल करण्यात आलेली फेरविचार याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आता गोविंदा मंडळांना थरांची २० फुटांपर्यंतची मर्यादा आणि १८ वर्षांखालील बाळगोपाळांच्या सहभागाविनाच दहीहंडीचा उत्सव साजरा करावा लागणार आहे. दहीहंडीमधील थरांच्या उंचीवर आणि बालगोपाळांना त्यामध्ये सहभागी करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातल्यानंतर याविरोधात मुंबईच्या ‘जय जवान’ गोविंदा मंडळाने न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली […]