सध्या देशात निवडणुकीशिवाय दुसरा धंदा उरलेला नाही. मात्र, निवडणुकीत माझ्या पक्षाचे आमदार निवडून येवोत किंवा न येवोत, मला त्याने कोणताही फरक पडत नाही. माझी सत्ता ही रस्त्यावर आहे, असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगपालिकांचे रणशिंग फुंकले. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.