आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेले मराठा समाजाचे मोर्चे हे शांततेत सुरू आहेत. ही जमेची बाजू आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने इतर घटकांच्या मुलभूत अधिकारांना धक्का न लावता आरक्षणाचा निर्णय त्वरीत घ्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उरण येथे मांडली.