उरी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी कराराचा वापर करून पाणीकोंडी करण्याचे संकेत दिल्यानंतर पाकचे धाबे दणाणले आहेत. सिंधू पाणी करारासंदर्भात आमचे शेजारी एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाहीत. तसेच या करारातील अटींचा भंग झाल्यास त्याकडे युद्धाचा भाग म्हणून पाहिले जाईल, असे पाककडून स्पष्ट करण्यात आले.