भारतातील मुस्लिम हे आपलेच असल्याचे सांगत त्यांना बळ देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोझीकोड येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत केले होते. पंतप्रधान मोदींनी अचानक घेतलेल्या भुमिकेबद्दल शिवसेनेने आश्चर्य व्यक्त करत येत्या काही महिन्यात उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतांवर डोळा ठेऊन तर असं काही होत नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली आहे.