गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रियाज भाटी याचा भाजपच्या कार्यकारिणीत समावेश करण्यावरुन सुरु झालेला वाद काही शमण्याची चिन्हे नाहीत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दाऊदचा हस्तक असलेला रियाज भाटी हा आशिष शेलारांसाठी काम करत होता आणि संपूर्ण मुंबईत भाजपला दाऊद टोळीनेच मदत केली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.