टाटा समूहाची धारक कंपनी असणाऱ्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून गच्छंती करण्यात आलेले सायरस मिस्त्री आपले गाऱ्हाणे ऐकविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेण्याची शक्यता आहे. रतन टाटा यांच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या सायरस मिस्त्री यांची सोमवारी अध्यक्षपदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती.