नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेप्रमाणे राज्याच्या विधानसभेतही विरोधकांकडून सरकारवर टीकेचा भडिमार केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नोटाबंदीच्या निर्णयाला आर्थिक स्वातंत्र्यलढा संबोधून त्याचे समर्थन करत असतील तर यामुळे जे बळी गेले ते शहीद नाहीत का, असा रोकडा सवाल उपस्थित करत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले.