वानखेडे कसोटीत इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४०० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱया दिवसाच्या अखेरीस १ बाद १४६ अशी मजल मारली आहे. भारतीय संघ अजूनही २५४ धावांनी पिछाडीवर असून भारताच्या हातात अजूनही ९ विकेट्स आहेत. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी मैदानात चांगला जम बसवला आहे.