आवाजी मतदानाने विश्वासमत प्रस्ताव पारित झाल्यावर त्यावर मतदान घेण्याची गरज नसून, काँग्रेसला आवश्यक वाटत असल्यास खुशाल अविश्वास प्रस्ताव आणावा असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला केले आहे. आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव पारित झाल्यावर बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत हे आव्हान केले. राज्यपालांना काँग्रेस आमदारांकडून झालेली धक्काबुक्की निंदनीय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.