ठरवून लग्न करताना मुलगी सुंदर, गोरी, सडपातळच हवी, अशी अपेक्षा सगळ्याच मुलांची असते. त्याबरोबर सुशील, गृहकृत्यदक्ष, उच्चशिक्षित वगैरे लेबल्स तर असतातच. लग्न आणि दिसण्या-असण्याच्या चौकटी आपण आजही तोडू शकलेलो नाही. काय वाटतं याविषयी तरुण पिढीला?अपेक्षा : गोरी, सुंदर, सुसंस्कृत, सडपातळ/मध्यम बांधा, मनमिळाऊ, उच्चशिक्षित, गृहकृत्यदक्ष वगरे वगरे. साधारण कोणत्याही वर्तमानपत्राच्या ‘वधू पाहिजे’ जाहिरातींमधल्या या अपेक्षा! त्यातही सुंदरतेची व्याख्या गोऱ्या रंगाशी, सडपातळ बांध्याशी, लांबसडक केसांशी एकत्र येऊनच थांबते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दम लगा के हैशा’ चित्रपटात लठ्ठ मुलीशी लग्न झालेल्या एका मुलाची गोष्ट आली आणि त्यानिमित्ताने किमान चर्चेला तरी चालना मिळाली. नव्या पिढीच्या तरुणाईला या लग्नाळू चौकटींविषयी काय वाटतं, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला.याबाबत पुण्याचा अनिकेत म्हणतो, ‘एखाद्या व्यक्तीचा बांधा, वर्ण हा कुठल्याही नात्याचा क्रायटेरिया असू शकत नाही, असूही नये. अर्थात कोणाला काय आवडावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी रंगापलीकडे जाऊन शिक्षण-स्वभाव असे विचार करण्यासारखे भरपूर मुद्दे आहेत.’ अनिकेतचे विचार असे असले तरी सावळ्या वर्णाबाबत अजूनही काही लोकांचे पूर्वग्रह आहेतच. स्थूलतेकडे झुकलेल्या वधू किंवा वरांना लग्न ठरवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद बघता हा विषय अनेकांच्या जिव्हाळ्याचा आहे, हे जाणवतं. एखाद्या जाड मुलीचा लाइफ पार्टनर म्हणून स्वीकार करणं यावर ऋत्विज म्हणतो, ‘मला एखादी जाड मुलगी बायको म्हणून चालेल, परंतु तिचा स्वभाव प्रेमळ व मनमिळाऊ हवा.’ निनादला या बाबतीत प्रॅक्टिकल विचार करायचा आहे. त्याच्या मते, ‘मला जर एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्य काढायचं असेल तर तिचं दिसणं-असणं मी का मॅटर करून घेऊ नये?.. आणि मुळात मी जर फिट असेन तर हे असं कोणाला तरी स्वीकारून त्याग वगरे करणं मला पटत नाही. आरोग्याच्या दृष्टीनेही फिटनेस महत्त्वाचा नाही का?’एखाद्या व्यक्तीचा बांधा, वर्ण हा कुठल्याही नात्याचा क्रायटेरिया असू शकत नाही, असूही नये. - अनिकेतमला जर एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्य काढायचं असेल तर तिचं दिसणं-असणं मी का मॅटर करून घेऊ नये? - निनादरंग-रूप-उंची यासोबतच मुलींची हेअरस्टाइल, ड्रेसिंग स्टाइल, खाण्याच्या सवयी, भटकंती, पार्टी करणं असे अनेकमुद्दे कमीजास्त प्रमाणात लग्नात अडसर बनून राहतात. शिक्षणामुळे विचार बदलायला सुरुवात झाली असली तरी आपलं ‘नेचर आणि नर्चर’ यामुळे अजून हे पॅरामीटर्स पूर्णपणे बदलू शकलो नाही.याबाबत विवाह समुपदेशक गौरी कानिटकरांना विचारलं. त्या म्हणाल्या, ‘दुर्दैवाने आजही आपल्याकडे लुक्स आणि बॉडी इमेज या गोष्टींना लग्न ठरवताना प्राधान्य दिलं जातं; परंतु प्री-मॅरेज कौन्सेिलगमध्ये मुलांना त्यांच्या प्रायोरिटीज ठरवायला सांगतो, तेव्हा शिक्षण आणि पॅकेजचा रँक पहिला येतो. आपल्या मनामध्ये लाइफ पार्टनरची आयडियल इमेज तयार झालेली असते आणि येऊ पाहणाऱ्या प्रत्येक माणसाशी आपण तिची तुलना करतो. कौन्सेिलगने क्वचित प्रश्न सुटतात; पण आजही आपण लग्न आणि दिसण्या-असण्याच्या चौकटी तोडू शकलेलो नाही.’आपल्या पार्टनरकडून किमान अपेक्षा ठेवण्यात काहीच गर नाहीये, परंतु दिसण्या-असण्याच्या अपेक्षांमध्ये अडकून बाकी चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायला नको. ती कशी दिसते यापेक्षाही ती व्यक्ती म्हणून कशी आहे हे जाणून घ्यायला हवं. कारण नात्यामध्ये गरजेचं असणारं प्रेम, आदर, विश्वास, काळजी हे रंगरूपावर नाही, तर त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. काय वाटतं तुम्हाला?भक्ती तांबे -viva.loksatta@gmail.com