खराब आणि भेसळयुक्त मावा/खव्यापासून तयार केलेले पेढे, मोदक आणि अन्य मिठाई खाल्यामुळे विषबाधा होण्याच्या घटनांमुळे या पदार्थाची लोकांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे माव्याखव्याच्या मिठाईच्या विक्रीत थोडी घट झाली आहे. गणेशोत्सव आणि त्या आधीपासून अन्न आणि औषध प्रशासनाकडून अन्य राज्यांतून मुंबईत येणाऱ्या माव्याची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली जाते. या मोहिमेत भेसळयुक्त किंवा खराब मावा जप्त केला जातोगुजरात आणि मध्यप्रदेशमधून प्रामुख्याने मावा मुंबईत येतो. रेल्वे व बसद्वारे आणण्यात येणाऱ्या माव्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची नजर असते. पेढे, मोदक आणि मिठाई तयार करण्यासाठी जो मावा वापरण्यात येतो, तो योग्य आहे की नाही, हे ठरविण्याचे जे काही निकष आहेत. त्यांची काटेकोर तपासणी केली जाते. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ६,०४८ किलो मावा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत १३ लाख ५८ हजार रुपये आहे. जप्त करण्यात आलेल्या माव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. गणेशोत्सव आणि सणासुदीच्या दिवसात मुंबई आणि परिसरात दररोज ६ ते ९ हजार किलो तर ठाणे-कल्याण परिसरात अडीच ते तीन हजार किलो मावा येतो, असे सूत्रांनी सांगितले. खराब किंवा भेसळयुक्त माव्यामुळे घडणाऱ्या विषबाधेच्या प्रकारांमुळे आता काही मिठाई व्यावसायिकांनी दूध आटवून त्यापासून पेढे, मोदक आणि अन्य मिठाईचे पदार्थ तयार करणे सुरू केले आहे.मुंबईत दररोज येतो ८ ते १० हजार किलो मावागणेशोत्सव काळात मुंबईत दररोज सुमारे ८ ते १० हजार किलो इतका मावा येत असतो. आम्ही मिठाई व्यावसायिक सर्व खबरदारी घेऊन आणि ताजा मावा वापरूनच पेढे/मोदक किंवा अन्य मिठाई तयार करतो. खराब किंवा भेसळयुक्त माव्यामुळे विषबाधा होण्याचे प्रकार खूप कमी आहेत. मात्र पेढे/मिठाई खाऊन घडणाऱ्या विषबाधेच्या काही घटनांमुळे सर्वसामान्य लोकांनाही असे पदार्थ खाण्याची भीती वाटते. त्यामुळे माव्यापासून तयार केलेले मेढे/मोदक खरेदीचे प्रमाण थोडेसे कमी झाले आहे. प्रदीप जैनअध्यक्ष मुंबई मिष्टान्न मंडळ