शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या लोकाधिकार समितीमुळे हजारो मराठी तरुणांना एअर इंडिया, बँका, पंचतारांकित हॉटेल्समध्ये नोकऱ्या मिळू शकल्या. हजारो मराठी तरुणांना रोजगार मिळवून देणारा हा ‘लाखांचा पोशिंदा’ गेला, अशा शब्दांत एअर इंडियामधील कर्मचाऱ्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.
एअर इंडियाचे निवृत्त वरिष्ठ एस. के. नंदा, के. एन. सपन, एन. एस. राजन आदींनी बाळासाहेबांच्या अनेक आठवणी यावेळी सांगितल्या. बाळासाहेबांचे एअर इंडियावर विशेष प्रेम होते. त्यामुळे केंद्रात एनडीएचे सरकार असताना खासगीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या त्यावेळी बाळासाहेबांनी एक आवाज देताच खासगीकरण बासनात गुंडाळाले गेल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले. एअर इंडिया लोकाधिकार समितीचे राजू जोशी, प्रशांत सावंत, सुरेश सावंत आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.