भ्रष्टाचारविरहित, सर्वगुणसंपन्न, अभ्यासू आणि जनतेशी जवळीक असणाऱ्या उमेदवाराला मतदान करून लोकशाही जिवंत ठेवण्याचे आवाहन नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघटनेच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘लोकसभेच्या निवडणुकीत नागरिकांचा सहभाग आणि अपेक्षा’ या चर्चासत्रातून मान्यवरांनी केले.
मतदान लोकशाही व्यवस्थेत महत्वपूर्ण असल्याने मतदानाच्या दिवशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क हमखास बजवावा असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक पां. भा. करंजकर यांनी केले. या चर्चासत्रात प्रा. यशवंत पाटील, स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर, प्रा. सुमन मुठे, जयश्री चव्हाण, ए. जी. शिरसाठ, सुरेश भोर आदिंनी सहभाग घेतला. प्रास्तविक व सूत्रसंचालन वृत्तपत्र लेखक संघटनेचे अध्यक्ष रमेश कडलग यांनी केले. सुरेश बागूल यांनी आभार मानले.