दै. मातृभूमीचे शेगाव येथील पत्रकार देवानंद उमाळे यांच्यावर शनिवारी एका टोळीने प्राणघातक हल्ला केल्याने उमाळे यांचे डोके व मानेला गंभीर दुखापत झाली असून त्यांना शेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेगाव येथील काही राजकारण्यांविरोधात बातम्या प्रकाशित केल्यामुळे आपल्यावर हा हल्ला झाल्याचे उमाळे यांनी म्हटले आहे. ते रात्री मित्रांबरोबर एका हॉटेलात जेवणासाठी गेले होते. त्या ठिकाणी सात-आठ जणांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला व ते पळून गेले. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून  जिल्हा पत्रकारांनी तीव्र निषेध नोंदविला आहे.