जमिनीचा मालक जिवंत असतानाही त्याला मृत दाखवून जमीन हडप केल्याप्रकरणी विश्वनाथ बांगर याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. हिंगोली येथील वंजारवाडा येथील रहिवासी पांडुरंग वामन बांगर यांनी तक्रार दिली असून, ते स्वत: मृत झाल्याची बनावट नोंद विश्वनाथने केल्याची तक्रार आहे. या बनावट कागदपत्राच्या आधारे जमीन बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हिंगोली तालुक्यातील वंजारवाडा येथील पांडुरंग बांगर यांचा मृत्यू १९७० मध्ये झाल्याचे नोंदविण्यात आले. त्यांच्या मालकीच्या जागेवर असलेले जुने घर पाडून नवे बांधण्यासाठी तालुका भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केल्यानंतर बनावट कागदपत्रांची माहिती मिळाली. त्यानुसार विश्वनाथ बांगर याने खोटी कागदपत्रे बनविल्याची तक्रार करण्यात आली.