मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कासवगतीमुळे वैतरणा नदीवरील मोखाडा-कसाऱ्याला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम रेंगाळले आहे. त्यामुळे पालिकेला सुमारे ७ कोटींचा भरुदड सोसावा लागला आहे. त्याशिवाय मुंबईकरांना मिळणारे ४५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी पोहोचण्यासही विलंब होत आहे.
वैतरणा नदीवर मोखाडा आणि कसाऱ्याला जोडणाऱ्या रस्त्यावर हा पूल आहे. मात्र मध्य वैतरणा धरण पूर्ण झाल्यानंतर हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. परिणामी या परिसराचा संपर्कच तुटणार आहे. त्यामुळे तेथे एक पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पुलाचे बांधकाम करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर होती. तो मार्च २०११ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अजूनही ते काम पूर्ण झालेले नाही. या पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून खर्चही २३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा अतिरिक्त भारही पालिकेवरच पडणार आहे. त्यासाठी ६ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. या विलंबामुळे मध्य वैतरणा धरणातील अतिरिक्त पाणी मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यास विलंब होणार आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















