महाराष्ट्राच्या विविध भागांतील  दुष्काळग्रस्तांना डोंबिवलीच्या श्री गणेश मंदिर संस्थानने पाच लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.  दुष्काळग्रस्तांना अधिक मदत करता यावी या उद्देशाने संस्थानने दुष्काळग्रस्त मदत निधी उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. २० फेब्रुवारीपासून गणेश मंदिरात हे निधी स्वीकृती केंद्र सकाळी दहा ते एक व संध्याकाळी चार ते नऊ या वेळेत खुले राहील. अधिकाधिक दानशूर नागरिकांनी सढळ हस्ते या उपक्रमाला मदत करावी, असे आवाहन मंदिर विश्वस्तांनी केले आहे. संपर्क- ९८२०१८३४१५.