शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर मागील आठवडय़ात दोन अपघात झाल्यानंतर आता या आठवडय़ात नाशिकरोड उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून टेम्पोने धडक दिल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर उड्डाणपुलाचे काम सुरू असून दुरूस्तीचे सामानही ठिकठिकाणी पडले आहे. पाईप असलेला कंटेनर उभा असताना त्यास टेम्पोने धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाल्याचे सांगितले जाते.
उड्डाणपुलावरील अपघातांना अतिवेग कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही वाहनांचा वेग कमी होण्याचे कोणतेच चिन्ह दिसत नाही. वाहनधारकांनी अपघात टाळण्यासाठी
वेग कमी ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.