२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात तैनात असणारे रेल्वे सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल मुरलीधर चौधरी शहीद झाले आणि त्यांच्या कुटुंबियांवर जणू आभाळच कोसळले. आता चार वर्षांनंतर अंबरनाथ येथील हे कुटुंब या धक्क्य़ातून हळूहळू सावरत आहे. त्यांची मोठी मुलगी प्रियांका लग्न होऊन सासरी गेली आहे, तर त्यावेळी नववीत असणारा धाकटा दैवेश आता तेरावीत आहे. तरीही या आपत्तीस कारणीभूत ठरलेला कसाब जिवंत असल्याची खंत त्यांच्या पत्नी स्नेहलता चौधरी यांच्या मनात होती. बुधवारी सकाळी त्याला फाशी दिल्याचे समजले आणि त्यांच्या मनात अशी समाधानाची ज्योत तेवली…