पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे भावी पिढीचे आरोग्य व भवितव्यही धोक्यात आलेले असल्याने प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे त्यातूनच निरोगी राहण्याचा मंत्र सापडेल, असा संदेश देण्यासाठी उरण तालुक्यातील चाणजे गावातील प्रकाश केणी यांनी सायकलने उरण ते चेन्नई असा १२ दिवसांचा प्रवास करण्याचा निर्धार केला आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी सकाळी चाणजे येथून करण्यात आली.
त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. जनजागृती करण्यासाठी विविध संदेश घेऊन जगातील अनेक जण भ्रंमती करत असतात.
त्यांच्या प्रवासाच्या कालावधीत ते आपल्या उद्देशानुसार ठिकठिकाणच्या नागरिकांपर्यंत आपला संदेश पोहचवितात. त्यांचा आदर्श घेऊन उरण तालुक्यातील केणी यांनी आपल्या पनवेल, पुणे येथील मित्रांच्या सहकार्याने उरण ते चेन्नई हा प्रवास १२ दिवसांत करण्याचा संकल्प केला आहे.