मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
मनसेचे आयुक्तांना निवेदन
जुन्या व पडीक विहिरींतील गाळ काढून शहराची पाण्याची गरज भागवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी अशा विहिरींतील उपसलेला गाळही कांबळे यांना प्रतीकात्मक स्वरूपात देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
औरंगाबाद शहरात सुमारे २०० जुन्या व पडीक विहिरी असून, किमान १०० विहिरी पाणी असलेल्या आहेत. या विहिरींमधील गाळ काढून किमान सांडपाणी म्हणून वा बांधकामासाठी या पाण्याचा वापर केला, तरी पिण्याचे पाणी सांडपाणी म्हणून व बांधकामासाठी या काळात वापरले जाणार नाही. अशा प्रकारे सुमारे ४० टक्के जास्तीचे पाणी उपलब्ध होऊ शकते, असे कार्यकर्त्यांनी कांबळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भीषण दुष्काळाच्या सध्याच्या काळात केवळ जायकवाडीवर अवलंबून राहणे योग्य नाही. त्यामुळे वेगळय़ा पर्यायांचा विचार होणे क्रमप्राप्त ठरल्याचे कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले.
या विहिरींमधील गाळ प्रतीकात्मक स्वरूपात काढण्यास मनसेच्या वतीने प्रारंभ केला असून, प्रशासनाने हे काम त्वरित हाती घ्यावे, यासाठी आपणास भेट देत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
येत्या दहा दिवसांत याची कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन काळे, जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी व डॉ. शिवाजी कान्हेरे यांच्या निवेदनावर सहय़ा आहेत.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















