ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विराट कोहली फलंदाजीत अपयशी ठरल्याबद्दल अनुष्का शर्माला जबाबदार धरणाऱ्या चाहत्यांवर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने तोफ डागली आहे. ही तो बाजारपेठेची इच्छा!विधिमंडळातही क्रिकेटज्वर.. ..अनुष्काला बघताच पडली माझी विकेट! समाजमाध्यमांवर अभिनेत्री अनुष्कावर जो टीकेचा भडिमार होत आहे, तो अयोग्य आहे.‘‘अनुष्काने काय चुकीचे केले? अन्य खेळाडूंचे कुटुंबीय जसे सामने पाहायला येतात, तशीच ती सामना पाहायला आली. कोहलीच्या कामगिरीबाबत तिला जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही. ही काही चाहत्यांची अपरिपक्वता आहे,’’ असे गांगुलीने सांगितले.‘‘जर दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम असेल, तर त्यात चुकीचे काय आहे,’’ असा सवाल या वेळी त्याने केला.‘‘भारतीय संघाच्या कामगिरीत काही उणिवा होत्या. यावर मात केल्यास पुढील विश्वचषकात आपला संघ अधिक शक्तिशाली संघ असेल,’’ असे तो म्हणाला.घरवापसी!अंदाज फसलेफसलेली रणनीतीभारताचा 'पंच'नामा!सांत्वनाचा शब्दच्छलअभी इतना बुढा नहीं हुआ हूं!पराभवानंतरही समाजमाध्यमांतून भारतीय संघाला पाठिंबा