२८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. ९ फेब्रुवारीला अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी अपघाताबाबत शंका उपस्थित करत व्हिएसआर विमान कंपनी, अॅरो कंपनी आणि पायलट कपूर यांची नावे घेतली. रोहित पवारांनी सरकारवर किंवा कोणावरही आरोप न करता, सीआयडी चौकशी आणि बाहेरच्या कंपन्यांची मदत घेण्याची विनंती केली.