scorecardresearch

मनसे

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्वीकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या केवळ एकाच उमेदवाराचा विजय झाला होता.


राज ठाकरे आपल्या विधानांवरून नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा विषय तापला होता. विरोधीपक्षांवर टीका करण्यासह ते मित्रपक्षांवरदेखील टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांच्यासाठी सभा घेतली होती.


Read More
Raj Thackeray Faces National Security Act Action Demand in Complaint to DG
राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाईची मागणी; महासंचालकांकडे लेखी तक्रार

पंकजकुमार मिश्रा, नित्यानंद शर्मा व आशिष राय या तीन वकिलांनी पत्र लिहून महासंचालकांकडे याबाबत कारवाईची मागणी केली

Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ विधानावरून पोलीस महासंचालकांकडे तक्रार, कारवाई करण्याची मागणी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलिकडेच मुंबईत केलेल्या एका जाहीर भाषणादरम्यान एका वक्तव्याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे.

Raj Thackeray news in marathi
ठाकरे गटाशी युतीविषयी निर्णय होणार का ?…मनसेचे सोमवारपासून इगतपुरीत शिबीर

महापालिका निवडणुकीत कुणाशी हातमिळवणी करायची, यावर मुख्यत्वे शिबिरात मंथनाची चिन्हे आहेत. काही वर्षांपूर्वी पक्षाचे अलिबाग आणि नंतर पनवेल येथे शिबीर…

हे प्रेम टिकवायचे की नाही हे ठाकरे बंधूंनी ठरवायचे आहे : मनसे नेते बाळा नांदगावकर

सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला नसता तर, पुढचे काही घडलेच नसते. हिंदी सक्ती केली तर, मराठी माणूस उठून पेटणारचं होता.…

Video Kasheli Tunnel Avinash Jadhav
Video: “कोकणवासियांच्या जीवाशी खेळ का?” कशेळी बोगद्याची भीषण परिस्थिती; मनसे नेते अविनाश जाधव यांनी शेअर केला व्हिडिओ

Kasheli Tunnel Video: अविनाश जाधव यांनी नाशिकच्या इगतपुरी भागात प्रवास करताना तिथे असलेल्या बोगद्यांतील सुविधांची तुलना कोकणातील बोगद्यांशी करून, “हजारो…

Shankaracharya Avimukteshwaranand On Thackeray Brothers
Thackeray Brothers : “राज आणि उद्धव ठाकरेंची युती…”; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींचं भाकीत काय? फ्रीमियम स्टोरी

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारधारा वेगळ्या झाल्या आहेत, काळानुरुप झालेला हा बदल आहे यात चुकीचं काही असंही शंकराचार्यांनी…

MNS protest in front of the municipality.
कडोंमपा आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावरून डॉ. दीपा शुक्ला यांच्या निलंबनाची मनसेची मागणी

शहरात डेंग्युने बळी जात असताना प्रशासन थंड बसले असल्याने मनसेच्या कल्याणमधील कार्यकर्त्यांनी गुरूवारी पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray
Brij Bhushan Singh : “…तर ते तुम्हाला झेपणार नाही”; ब्रिजभूषण शरण सिंह यांचा राज ठाकरेंना इशारा; म्हणाले, “भाषा…”

मराठी विरुद्ध अमराठी या वादात भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनीही उडी घेतली आहे.

mira bhayandar
१८ जुलै रोजी राज ठाकरे मिरा भाईंदरमध्ये! पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मिरा भाईंदर शहरात ८ जुलै रोजी मराठी भाषिक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मराठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

Satbara Kora Kora Yatra government ignores farmers plight MNS has taken a strong stand supporting them
मनसेने घेतली मुंबईतील शेतकऱ्यांच्या मोर्चाची जबाबदारी, बच्चू कडूंच्या ‘सातबारा कोरा’ यात्रेला पाठिंबा

राज्यातील संवेदनाहीन सरकार शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे डोळेझाक करत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे.

Mud on Thane's Kolshet Road... Fear of accidents due to vehicles slipping
ठाण्याच्या कोलशेत मार्गावर चिखल…वाहन घसरुन अपघातांची भिती

ठाणे महापालिका क्षेत्रात हवा प्रदुषणास कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याची मोहिम प्रशासनाने काही महिन्यांपुर्वी हाती घेतली होती.

संबंधित बातम्या