महाराष्ट्राची भाग्यदायिनी असे कोयना नदीला म्हटले जाते. या नदीवर कोयना धरण बांधलेले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या या धरणाचे बांधकाम १९५६ मध्ये सुरु झाले होते. त्यानंतर आठ वर्षांनी १९६४ मध्ये धरण बांधून पूर्ण झाले. सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या कोयना धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाला शिवसागर असे म्हटले जाते. या जलाशयाच्या काठावर कोयना अभयारण्य आहे. या धरणाची उंची १०३.२ मी (३३९ फूट) तर लांबी ८०७.२ मी (२,६४८ फूट) इतकी आहे. या धरणाचा वापर सिंचन आणि वीज निर्मिती यांसाठी केला जातो. २७९७.४ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या या धरणाची वीज निर्माण करण्याची क्षमता १,९२० मेगाव्हॉट इतकी आहे. १९६९ मध्ये झालेल्या कोयनानगर भूकंपाने या धरणाला काही भेगा पडल्या होत्या. तेव्हा झालेले नुकसान भरुन काढण्यात आले. १९७३ मध्ये धरणाचा ओव्हरफ्लो नसलेला भाग तयार करण्यात आला. त्यानंतर २००६ मध्ये स्पिलवे विभाग मजबूत करण्यात आला. आता हे धरण भविष्यामध्ये १९६९ पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपजन्य परिस्थितीचा सामना करु शकते असे म्हटले जाते.Read More
महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करून उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या गाळ उपसा मोहिमेचा श्रीगणेशा…
कोयना प्रकल्पाच्या पोफळीतील बोगद्याला गळती लागली आहे. त्याचा परिणाम प्रकल्पाच्या वीज निर्मितीवर झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पोफळीतील बोगद्याला गळती…
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८० हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात साडेसहा दशकांपूर्वी करण्यात…
झाडानी प्रकरणातील मोठ्या जमीन खरेदी व्यवहारावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू ठेवत २६ नोव्हेंबरला कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेश जीएसटी आयुक्त वळवी आणि…