महाराष्ट्राची भाग्यदायिनी असे कोयना नदीला म्हटले जाते. या नदीवर कोयना धरण बांधलेले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या या धरणाचे बांधकाम १९५६ मध्ये सुरु झाले होते. त्यानंतर आठ वर्षांनी १९६४ मध्ये धरण बांधून पूर्ण झाले. सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या कोयना धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाला शिवसागर असे म्हटले जाते. या जलाशयाच्या काठावर कोयना अभयारण्य आहे. या धरणाची उंची १०३.२ मी (३३९ फूट) तर लांबी ८०७.२ मी (२,६४८ फूट) इतकी आहे. या धरणाचा वापर सिंचन आणि वीज निर्मिती यांसाठी केला जातो. २७९७.४ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या या धरणाची वीज निर्माण करण्याची क्षमता १,९२० मेगाव्हॉट इतकी आहे. १९६९ मध्ये झालेल्या कोयनानगर भूकंपाने या धरणाला काही भेगा पडल्या होत्या. तेव्हा झालेले नुकसान भरुन काढण्यात आले. १९७३ मध्ये धरणाचा ओव्हरफ्लो नसलेला भाग तयार करण्यात आला. त्यानंतर २००६ मध्ये स्पिलवे विभाग मजबूत करण्यात आला. आता हे धरण भविष्यामध्ये १९६९ पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपजन्य परिस्थितीचा सामना करु शकते असे म्हटले जाते.Read More
महाराष्ट्रातील मोठ्या क्षमतेच्या धरणांमध्ये कोयना ऊर्फ शिवसागरचा समावेश होतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीवरील हे धरण. वीजनिर्मिती, शेतीसाठी…
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा कलगीतुरा रंगत असतानाच, कोयना धरणातील पाणी सोडण्याच्या प्रश्नावरूनही सत्ताधारी आघाडीतील दोन पक्षांमध्येच…
कोयना धरणाचे पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्याऐवजी सातारा, सांगली जिल्ह्यांतील नागरिकांना शेती आणि पिण्यासाठी देण्याची लोकप्रतिनिधींसह स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे.
कोयना प्रकल्पग्रस्तांना मोबदल्यापोटी ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जागा वितरीत करण्यात आली असून अंबरनाथ तालुक्यातील चिखलोली येथील जागाही त्यांना देण्यासाठी हालचाली…