आधी करोना, नंतर राजकीय सुंदोपसुंदी व सरतेशेवटी आरक्षणाच्या वादामुळे न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर महाराष्ट्रात पार पडल्या. गेल्या वर्षाच्या शेवटी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार ३१ जानेवारीपर्यंत या सर्व निवडणुका पूर्ण करणं निवडणूक महाराष्ट्र निवडणूक आयोगावर बंधनकारक होतं. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपरिषद न नगरपंचायत, दुसऱ्या टप्प्यात मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आयोगाने न्यायालयाकडून अतिरिक्त वेळ मागून घेतला. त्यानुसार ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातल्या १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या.