पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रचार सभेत बोलत असताना भाजपावर कडाडून टीका केली. मतदानपूर्व येणाऱ्या चाचण्या खोट्या असून भाजपा २०० जागांच्याही पुढे जाणार नाही.
१९ एप्रिलला होणारे पहिल्या टप्प्यातील मतदान भाजपासाठी महत्त्वाचे आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर बंगालमधील तीन जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात अलीपुरद्वार, कूचबिहार व जलपाईगुडी या तीन जागांचा समावेश आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) व समान नागरी कायदा यांची आपण राज्यात अंमलबजावणी होऊ देणार नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सांगितले.
निवडणूक आयोगाने बंगाल सरकारला गेल्या वर्षीच्या पंचायत निवडणुकीतील हिंसाचाराच्या घटनांचा तपशील लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सामान्य निरीक्षकांना देण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी सध्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. या जागेवरून ममता यांनी पुन्हा एकदा अभिषेक बॅनर्जी यांना उमेदवारी दिली आहे, तर भारतीय जनता पक्षाने कौस्तब बागची यांना उमेदवारी दिली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआयएच्या कारवाईवरून केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली आहे. तर, एनआयएच्या पथकावरील हल्ल्याला टीएमसी जबाबदार असल्याचे भाजपाने म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकावर जमावाकडून हल्ला झाल्याची घटना घडली. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनआयएच्या अधिकाऱ्यांनाच खडेबोल सुनावले.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकावर पश्चिम बंगालमध्ये जमावाकडून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन अधिकारी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी म्हणतोय की देशातून भ्रष्टाचार हद्दपार करा आणि विरोधी पक्ष म्हणतायत भ्रष्टाचाऱ्यांना वाचवा. ते म्हणतात मोदींचं कुटुंबच नाही. परंतु, संपूर्ण भारत हेच माझं कुटुंब आहे.