भारतामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला केरळमध्ये पाऊस (Rainy Season) पडल्यानंतर पावसाचे आगमन झाले असे समजले जाते. महाराष्ट्रामध्ये १५ जूनपर्यंत पावसाळा सुरु होतो. ईशान्य दिशेकडून येणाऱ्या मौसमी वाऱ्यांमुळे भारतामध्ये पाऊस पडतो. भारतामध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये पावसाळा असतो. ऑगस्ट (श्रावण) महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढते. आपला देश शेतीप्रधान असल्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी पाऊस ठराविक वेळेमध्ये पडणे आवश्यक असते. पावसाळ्यामध्ये नैसर्गिक समृद्धी वाढत जाते.
या ऋतूमध्ये अनेक सण-उत्सव असतात. चेरापुंजी आणि मौसिनराम या दोन ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. तर जैसलमेर आणि लेह या दोन जागी सर्वात कमी पाऊस पडला असल्याची नोंद होते. पावसावर भारतीय अर्थव्यवस्थेपासून सर्वच गोष्टी अवलंबून आहेत.Read More
Health Special: पावसाळ्यातील अनारोग्यकर वातावरण व त्यामुळे शरीरामध्ये घडणार्या अहितकारक घडामोडी, बदल शरीराला कमीतकमी बाधक व्हाव्यात,याच हेतूने हे उपवास सांगण्यात…
पावसाळ्यात वातावरणात दमटपणा असल्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्स सतत येतात. जर पावसाळ्यात तुम्हाला तुमची त्वचा निरोगी…