scorecardresearch

आत्महत्या

स्वतःच स्वतःचे आयुष्य संपविण्याचे कृत्य म्हणजे आत्महत्या होय. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला आपले जीवन निरर्थक किंवा नीरस वाटते तेव्हा त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे (Subside) विचार येतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. जीवनामध्ये सतत येणारं अपयश, आर्थिक संकटे, नातेसंबंधांतील गुंतागुत अशी आत्महत्येमागील कारणे असण्याची शक्यता असते. काही वेळेस मानसिक आजारांमुळेही आत्महत्या करण्याचे विचार मनामध्ये येत असतात. मानसिक त्रास, असहाय्यता संपवण्याच्या उद्देशाने लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. आकडेवारीनुसार, जगभरात दर वर्षी सुमारे दहा लाख लोक आत्महत्या करायचा प्रयत्न करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, मानवी मृत्यूच्या कारणांच्या क्रमवारीमध्ये आत्महत्या हे तेराव्या क्रमांकावरचे कारण आहे.


ब्रिटीश काळातील भारतीय दंड संहिता १८६० मध्ये असलेल्या कलम ३०९ नुसार आत्महत्या करणे हे कायद्याने गुन्हा आहे असे नमूद करण्यात आले होते. या कलमानुसार, “जो कुणी आत्महत्येचा प्रयत्न करील आणि असा अपराध घडण्याच्या दृष्टीने कोणतीही कृती करील त्याला एक वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील” हे कलम जुनाट असून त्यावर अनेकदा टीका झाली. १९७१ मध्ये हे कलम रद्द करण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न केले गेले. पुढे अनेकदा त्यावर चर्चा झाल्या. २००८ मध्ये विधी आयोगाच्या २१० व्या अहवालामध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय आणि मनोरुग्ण उपचारांची गरज आहे, शिक्षेची नाही. असे नमूद करण्यात आले. पुढे २०१७ मध्ये याविशयी विधेयक आणून २०१८ मध्ये ते अमलात आले.


मानसिक आरोग्य विधेयकाच्या कलम ११५ (१) मध्ये म्हटले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ३०९ व्याख्येनुसार काहीही असले तरी आत्महत्येचा प्रयत्न करणारी कोणतीही व्यक्ती, गंभीर ताणतणावात असल्याचे गृहित धरले जाईल आणि या संहितेमनुसार सदर व्यक्तीविरोधात खटला चालवला जाणार नाही आणि त्याला शिक्षा दिली जाणार नाही.मानसिक आरोग्य विधेयकाच्या कलम ११५ (२) नुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने पुन्हा अशा प्रकारच्या कृत्याची पुनरावृत्ती करू नये किंवा तसा धोका निर्माण होऊ नये यासाठी संबंधित सरकारने अशा व्यक्तीची काळजी घेणे, त्याला उपचार देणे आणि त्याचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सरकारचे हे कर्तव्य आहे.


या व्यतिरिक्त आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे हा भारतामध्ये मोठा गुन्हा मानला जातो. कलम १०६ नुसार, “एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्यास अशा आत्महत्येस जर कुणी प्रवृत्त केले असेल तर त्याला दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच द्रवदंडांची शिक्षाही ठोठावली जाऊ शकते.” तर कलम १०५ नुसार “१८ वर्षांखालील कोणतीही व्यक्ती, मानसिक आजार असलेली कोणतीही व्यक्ती, कोणतीही भ्रमिष्ट व्यक्ती किंवा नशेच्या अमलाखाली असलेली व्यक्ती आत्महत्या करेल आणि अशा व्यक्तीच्या आत्महत्येसाठी जर कुणी जबाबदार असेल तर त्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची किंवा दहा वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या मुदतीचा कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होऊ शकते.”


प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास, दु:ख, वेदना असतात. प्रत्येकजण संकटांचा सामना करत असतो. तेव्हा अपयशाने खचून न जाता सतत संघर्ष करणे आवश्यक असते. आत्महत्या करणे हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. आत्महत्या करण्याचे विचार मनात येत असल्यास तुम्ही जवळच्या व्यक्तीची मदत घेऊन परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करु शकता. शासनही त्यामध्ये मदत करते. सरकारच्या अनेक हेल्पलाइन्स मानसिकदृष्टा खचलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी तत्पर असतात.


Read More
pune fruit vendor strangled his wife to death due to debt After that, he committed suicide by hanging himself in Manjari Khurd area
मांजरी खुर्दमध्ये पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या;कर्जबाजारी झाल्यामुळे टोकाचे पाऊल 

कर्जबाजारी झाल्यामुळे फळविक्रेत्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रोजी मांजरी खुर्द…

buldhana Revealed in Instagram post A young man hanged himself for love
प्रेमापायी युवकाने घेतला गळफास! ‘इंस्टाग्राम पोस्ट’ने केलं उघड…

आत्महत्या पूर्वी त्याने इंस्टाग्रामवर टाकलेल्या काही ‘पोस्टस’ आणि ‘कॉल रेकॉर्डिंग’ यापरिणामी यामुळे आत्महत्येचे कारण उघडं झाले.पोलिसांनी याप्रकरणी खोलात जाऊन तांत्रिक…

A 43 year old woman committed suicide by jumping into the sea at Marine Drive
मरीन ड्राइव्ह येथे महिलेची आत्महत्या

वाहतूक पोलीस सुरेश गोसावी यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून महिलेला बाहेर काढले. पण, पुढे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू…

Two students preparing for the NEET exam ended their lives due to stress
धक्कादायक! ‘नीट’चे टेंशन अन् दोन विद्यार्थ्यांनी संपवले जीवन…

अभ्यासाच्या तणावातूनच या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विविध कारणांवरून सर्वसामान्यांच्या जीवनात तणावाची परिस्थिती निर्माण होत…

gondiya Student commits suicide
बारावीत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मेला कृष्णाचा वाढदिवस होता. पण त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने हाच त्याचा मृत्यू दिवस ठरला. मुलाच्या…

Vasai Rejection for marriage young woman commits suicide
खालच्या जातीची असल्याचे कारण देत लग्नास नकार, वसईतील तरुणीची आत्महत्या

या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात प्रियकर व त्याचे वडील दोघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर…

gilr suicide after Class 12 result
दुर्दैवी! बारावीचा निकाल पाहण्यापूर्वीच विद्यार्थिनीची आत्महत्या

हिना ज्ञानेश्वर आडे (१७, रा. पांढुर्णा, ता. यवतमाळ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. हिना नेर येथील दि इंग्लिश स्कूल…

Two 12th standard students commit suicide in Jalgaon district due to low marks
जळगाव जिल्ह्यात कमी गुण मिळाल्याने बारावीच्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने जिल्ह्यातील ममुराबाद आणि पाचोरा येथे सोमवारी दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेतला

student committed suicide
नीट परीक्षेच्या तणावातून दिग्रस येथे विद्यार्थ्याची आत्महत्या

अपेक्षित निकाल न लागल्यास आई-वडिलांच्या अपेक्षांवर पाणी फिरेल या भीतीने मानसिक तणावात असलेल्या लकीने रविवारी रात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरी…

bhiwandi four suicide news in marathi
Bhiwandi Suicide News : भिवंडीत आढळले एकाच कुटूंबातील चौघांचे मृतदेह, मृतांमध्ये आईसह तीन मुलींचा समावेश

लालजी भारती हे यंत्रमाग कामगार असून शहरातील एका यंत्रमाग कारखान्यात काम करतात. लालजी हे शुक्रवारी रात्री कारखान्यात कामावर गेले होते.

संबंधित बातम्या