scorecardresearch

ठाणे

ठाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोकण विभागामध्ये या जिल्ह्याचा समावेश होतो. ठाणे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या उत्तरेला वसलेले आहे. ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. याच्याजवळच मुंबई महानगर प्रदेश (MMR)चा भाग देखील आहे.

ठाण्याचा उल्लेख तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्यामध्ये आढळतो. सातवाहन, चालुक्य, पोर्तुगीज यांच्यासह विविध राजवटींनी ठाण्यावर राज्य केले. आज ठाणे हे सुमारे १.८ दशलक्ष लोकांनी गजबजलेले शहर आहे.<br />
नौकाविहार आणि सहलीसाठी प्रसिद्ध असलेले उपवन तलाव हे ठाण्यातील प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय केळवा चौपाटी, येऊर हिल्स अशा ठिकाणीही लोक फिरायला जातात. सर्फिंग, वॉटर स्पॉर्ट्ससाठी केळवा चौपाटी प्रसिद्ध आहे. तर येऊर ही जागा तिच्या नैसर्गिक सौदर्यासाठी लोकप्रिय आहे.

हिंदू संस्कृती आणि मराठी सण हे ठाण्याची ओळख आहेत. येथे गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी आणि होळी असे सण जल्लोषात साजरे केले जातात.

ठाण्यामध्ये रस्ते, रेल्वे यांसह हवाई मार्गांचे जाळे आहे. यांच्यामार्फत हे शहर महाराष्ट्रातील अन्य शहरांशी जोडले गेले आहे. भारतातील प्रमुख ठिकाणांना जोडणारी उत्तम विकसित पायाभूत सुविधा ठाण्यामध्ये आहेत. ठाण्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ठाणे कॅम्पससह अनेक शैक्षणिक संस्था आहेत. याशिवाय मोठमोठी अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेली रुग्णालयेही या शहरामध्ये आहेत. ठाणे हे आरोग्य सेवा केंद्रांचे घर बनले आहे.

सांस्कृतिक वारसा लाभलेला ठाणे हा जिल्हा नैसर्गिकरित्या समृद्ध आहे. विविध सुविधा आणि सेवा असलेले ठाणे शहर तेथील रहिवाश्यांसाठी अनुकूल आहे. पर्यटकांसाठीही ही जागा आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: उपवन किल्ला, घोडबंदर किल्ला यांसारखे ऐतिहासिक किल्ले; उपवन तलाव, ठाणे खाडी, मासुंदा तलाव (तलाव पाली) अशा ठिकाणांसाठी ठाणे प्रसिद्ध आहे.

ठाण्यातील हवामान कसे आहे?
उन्हाळ्यात ठाण्यातील हवामान हे उष्ण-दमट स्वरुपाचे असते. तर हिवाळा हा सौम्य असून तेथे उष्णकटिबंधीय हवामान असते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळा असतो. या चार महिन्यात शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतो.

मी ठाण्यात कसे पोहोचू शकतो?
उत्तर: ठाणे हे रेल्वे, महामार्ग आणि हवाईमार्गांनी भारताच्या विविध ठिकाणांशी जोडलेले आहे. ठाण्यापासून २५ किमी अंतरावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ठाण्यामध्ये रेल्वे स्टेशन देखील आहे. रेल्वेद्वारे ठाणे हे मुंबई व महाराष्ट्रातील अन्य भागांशी जोडले गेले आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांशी ठाणे शहर रस्त्यांद्वारे जोडले गेले असल्याने महामार्गाचा वापर करुन ठाण्याला जाता येते.

ठाण्यातील काही लोकप्रिय पर्यटन आकर्षणे कोणती आहेत?
उपवन तलाव, घोडबंदर किल्ला, मासुंदा तलाव (तलाव पाळी), केळवा चौपाटी, टिकुजीनी-वाडी, ओवळेकर वाडी, फुलपाखरु उद्यान आणि बावखळेश्वर मंदिर असे काही पर्यटन स्थळे ठाण्यामध्ये आहेत.

ठाण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
ठाण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. या चार महिन्यांमध्ये ठाण्यात हिवाळा असतो. आल्हाददायक हवामान असल्याने ही वेळ फिरण्यासाठी अनुकूल असते. जर तुम्हाला पाऊस आवडत असेल, तर तुम्ही जून ते सप्टेंबर या महिन्यांत ठाण्याला जाऊन पाऊस आणि हिरव्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

Read More
many Kalyan dombivli security guards face months of unpaid salaries from private security agencies
कल्याण, डोंबिवलीतील अनेक खासगी सुरक्षा रक्षक वेतनाविना, सुरक्षा एजन्सींवर कारवाईसाठी शिवसेनेचे उपायुक्तांना पत्र

कल्याण डोंबिवली शहर परिसरात अनेक खासगी सुरक्षा रक्षक खासगी सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून मिळणाऱ्या वेतनावर काम करतात. काही खासगी सुरक्षा एजन्सी…

thane administration acts against sand mafias illegally extracting sand
कळवा खाडीत अवैध रेती उपसा, ठाणे महसुल आणि तहसील विभागाने केली कारवाई, ८० लाखांचे साहित्य जप्त

ठाणे जिल्ह्यातील खाडीत बेकायदा रेती उपसा करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून खारेगाव भागातील रेतीबंदर खाडी पात्रात बेकायदा…

thane all private pre primary schools for ages 3 to 6 must now register in the district
खासगी पूर्व प्राथमिक शाळांसाठी नोंदणी अनिवार्य, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांचे निर्देश

जिल्ह्यातील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खासगी शैक्षणिक संस्थांसाठी शालेय नोंदणी बंधनकारक करण्यात आली…

thane pre monsoon rains in May causing disruptions in the power supply System
बदलापुरात विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण; समाज माध्यमांवर महावितरणाला लाखोल्या, महावितरणाकडून दुरूस्तीचे कारण

पूर्व मोसमी पावसाने लवकरच हजेरी लावल्याने मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात जून महिन्याचा पहिला आठवडा असल्याचे भासते आहे. मात्र यामुळे विजवितरण…

toilet project on ghodbunder route may end due to space issues from metro flyover work
ठाण्यात महत्वाकांक्षी शौचालयांचा प्रकल्प गुंडळणार ? विविध प्रकल्प महामार्गावर जागाच नाही

घोडबंदर मार्गावर रस्ते जोडणी, मेट्रो आणि उड्डाण पुलांच्या कामामुळे जागाच उपलब्ध नसल्याने शौचालये उभारणीचा प्रकल्प गुंडाळण्याचा विचार पालिका प्रशासनाने सुरू…

Metro roof work close Nitin flyover
नितीन कंपनी उड्डाणपुलावरील वाहतूक रात्रीच्या वेळेत राहणार बंद, मेट्रो स्थानकाच्या छत उभारणी कामामुळे वाहतूक पोलिसांचा निर्णयv

मेट्रो स्थानकावर छत उभारणीचे काम हाती घेण्यात येणार असून मुंबई-नाशिक महामार्गावरील नितीन कंपनी उड्डाण पुलावरील वाहतूक २५ मेपर्यंत रात्री ११…

Eknath Shindes and ganesh naik
” नाईकांच्या खात्यावर ” का संतापले एकनाथ शिंदे ?

नुकत्याच पार पडलेल्या ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक मंत्री असलेल्या वनखात्यावर चांगले संतापलेले दिसून आले.शिंदे…

dcm Eknath Shinde on gaimukh road project
सार्वजनिक हिताच्या आड आलात तर गुन्हा दाखल करू ! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वनविभागाला तंबी

पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि खरीप हंगाम नियोजन बाबत उपमुख्यमंत्री आणि ठाणे पालकमंत्री…

The Welfare Department of the Thane Crime Investigation Branch has arrested four inmates involved in robbery and housebreaking
सराईत गुन्हेगार अटक; ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, दरोडा आणि घरफोडी करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेेच्या कल्य़ाण विभागाने अटक केली आहे.…

water shortage in ghodbunder
विश्लेषण : महागडी गृहसंकुले उभी तरीही… ठाण्याचा घोडबंदर परिसर दुष्काळी का ठरतोय?

ठाणे महापालिकेचे स्वमालकीचे धरण नाही. यामुळे पाणी पुरवठ्यासाठी पालिकेला वेगवेगळ्या स्रोतांवर अवलंबून रहावे लागत आहे.

Kalyan revenue department announced sarpanch post reservations for 41 Gram Panchayats from 2025 2030
कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींंच्या सरपंचांचे आगामी पाच वर्षातील आरक्षण जाहीर

कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचे सरपंच पदासाठीचे आरक्षण कल्याण महसूल विभागाने जाहीर केले आहे. आगामी सन २०२५ – २०३० या कालावधीत…

MMRDA Bhayanderpada flyover cut traffic by 60 percent
नव्या उड्डाणपूलामुळे कोंडीत घट

घोडबंदर मार्गावरील कासारवडवली, ओवळा, गायमुख येथील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी भाईंदरपाडा येथे एमएमआरडीएने उड्डाणपूल उभारला आहे.या उड्डाणपूलाच्या निर्माणामुळे या भागातील वाहतुक…

संबंधित बातम्या