महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांचं नियोजन जाहीर केलं. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपरिषद न नगरपंचायत, दुसऱ्या टप्प्यात मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आयोगाने न्यायालयाकडून अतिरिक्त वेळ मागून घेतला. त्यानुसार ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातल्या १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रात या निवडणुका प्रलंबित राहिल्या होत्या. त्यामुळे बहुतांश भागात स्थानिक कारभार हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात होता. अखेर निवडणुका पार पडल्या असून त्यानुसार पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी सत्तास्थानी आले आहेत.