भारत – अमेरिका यांच्यात दिल्ली येथे झालेल्या परिषदेत तीन करार झाले, अमेरिकेने पाकिस्तानला इशाराही दिला. तरीही हे यश आपणास हवे होते तितके नाही..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी दोन वेळा रद्द झालेली अमेरिका आणि भारत यांच्यातील दोन अधिक दोन परिषद दिल्लीत अखेर झाली. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दाखवलेली चिकाटी निश्चितच अभिनंदनीय. सध्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेकडून काही काढून घेणे तितके सोपे नाही. तरीही ही दोन अधिक दोन परिषद पार पडली आणि तीत तीन करार होऊ शकले. मोदी सरकारचे हे यश ठरते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या दुहेरी चर्चेत भारताचे प्रतिनिधित्व केले. एकाच वेळी परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण यावर चर्चा करणे हाच या दोन अधिक दोन परिषदेचा हेतू. या आधी आपण जपानशी अशी दुहेरी चर्चा केली. परंतु त्यापेक्षा अमेरिकेबरोबर अशी चर्चा होणे हे कित्येक पटींनी महत्त्वाचे होते. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरींमुळे ही चर्चा दोन वेळा ऐनवेळी रद्द करावी लागली. त्यामुळे आताची चर्चादेखील होते की नाही याविषयी शंका होतीच. पण तसे काही झाले नाही. ही चर्चा निर्विघ्न पार पडली. अमेरिकेतर्फे परराष्ट्रमंत्री मायकेल पाँपेओ आणि संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस या चर्चेसाठी दिल्लीत आले होते. या चौघांतील चर्चात उभय देशांतील संबंधांबाबत तीन महत्त्वाचे करार पार पडले. या चर्चेचे महत्त्व लक्षात घेता तिच्या फलिताचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक ठरते.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trade between india and usa
First published on: 10-09-2018 at 02:36 IST